निरंजन माधव - भक्तोत्कर्ष

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


रामा ! त्वद्भट मारुती करितसे गोपाद आपांपती

लंकेमाजि सती विलोकुनि महासंतोष दे तीप्रती ।

केला रावण तो तृणोपम पुरी ते कांचनी जाळिली

नेला अक्षय संक्षयासि महिमा तूझी जगीं दाविली ॥८८॥

जो कोट्यर्बुद योजनें नभपथें द्रोणागिरी आणिला

केला लक्ष्मण सावधान अणखी नेवोनि स्थापिला ।

जो एका निशिमाजि उद्भट अशा कर्मासि जो कां करी

रामा ! त्वकरुणाकटाक्षमहिमा दावी त्रिलोकांतरी ॥८९॥

कोठें रावण ! कैं सुवर्णनगरी लंका समुद्रोदरीं !

कोठें राक्षस ते महोद्भत सुरां संत्रासिती संगरीं ।

रामा ! ते कपि सत्वहीन असतां पालाफळें खायिरीं

त्यांपासोनि अशांसिही वधविलें ! तुझी कृपा हे खरीं ॥९०॥

रामा ! ते शबरी किरातकुळिची तीनें फळें अर्पिलीं

जें कां सांचुनि ठेविली बुरटलीं उष्टीं जुनीं आपुलीं ।

तीं त्वां स्वीकरिलीं म्हणोनि कळलें भक्तीं तुला अर्पिलें

दोषादोष न पाहतां प्रभुवरा ! आरोगिसी चांगलें ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP