निरंजन माधव - वैषम्यनैर्घृण्यपरिहार

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


कीर्तीनें तरती क्षितीं मनुज ते पाताळिच्या दानवां

पावाया तव भोतिकारण घडे तूझ्या पदीं वैभवा ।

रामा ! स्वर्गवतां तथा मुनिजनां त्वद्भक्ति तारीतसें

द्वेषीभक्तउपेक्ष्य यापरि तुला वैषम्य देवा नसे ॥८४॥

शिष्टांतें परिपाळितोसि म्हणती दुष्टांस संहारिसी

माया मात्र तुझी दिसे उभयतां तूं निश्चयें पाळिसी ।

कोण्या एकमिसें दयांबुधि तुवां उद्धार त्याचा किजे

देवा ! निर्घृण तूं ह्नणोनि तुजला त्या तामसीं मानिजे ॥८५॥

आहे मी सस सर्वभूतनिवहीं वैषम्य नाहीं मला

गीतेमाजि असाचि अर्थ बरवा त्वां अर्जुना बोधिला ।

तैं आलें मम मानसाप्रति बकी मारावयाला तुला

आली ते जननीगतीस मिनली नाहीं पदा ज्या तुळा ॥८६॥

रामा ! त्वत्प्रियवल्लभा दशमुखें नेली वनीं चोरुनी

तेणें कष्ट तुला बहूत घडले ते हिंडतां मेदिनी ।

ऐशा दुष्टमतीसही पद तुवां दिल्हें ! मुनीद्राप्रती

नोहे लभ्य अनंत सौख्य विलसे तैं पावला निश्चितीं ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP