हरिपाठ - अभंग २१

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


नामास काळवेळ नसुन ते दोही पक्षाचा उद्धार करितें.

काळवेळ नामस्मरणासी नाहीं । दोही पक्ष पाही उद्धरती ॥१॥

रामकृष्ण नाम हें सर्व दोषांचें हरण करणारें असुन जड जीवांचा तारण एक हरिच आहे.

रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जड जीवां तारण हरी एक ॥२॥

या नामाच्या जिव्हेत हरिनाम सर असुन त्याचें महात्म्य कोण जाणेल ?

हरिनामसार जिव्हां या नामाची । उपमा त्य देवांची कोण वानी ॥३॥

पुर्वजांना ज्या योगानें वैकुंठमार्ग सोपा झाला तो हरिपाठ ज्ञानेश्वरमहाराजांनी सांग केला

ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ । पुर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP