हरिपाठ - अभंग १३

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


समसुखांवाचुन द्वैतबुद्धीला हरीची समाधी साधत नाही.

समाधी हरीची सम सुखेविण । न साहेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥

दुजेपणाचा आभाव हेंच बुद्धीचे वैभव

बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एक्या केशवराज सकळसिद्धी ॥२॥

परमानंदांत मन नसेल तर रिद्धि सिद्धि ही अवघी उपाधिच होय.

रिद्धि सिद्धिनिधी अवघोच उपाधि । जंव त्या परमानंदी मन नाही. ॥३॥

सर्वकाळ हरीच चिंतन हेंच समाधान

ज्ञानदेव रम्य रमलें समाधान । हरीच चिंतन सर्वकाळ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP