हरिपाठ - अभंग ६

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


साधुबोधा झाला तो नुरोनिया उरुण अनुभवासकट ठायींच मुरतो

साधुबोध झाला नुरोनिया ठेला । ठायींच मुराला अनुभव ॥१॥

ठायींच समाप्ति झाली त्यावेळी कापुरांची ज्योति पेटली.

कापुराची वाती उजळली ज्योती । ठायीच समाप्ती झाली जैशी ॥२॥

मोक्षरेखेवर आलेला साधुचा अंकित असा हरिभक्त भाग्यवान होतो.

मोक्षरेखें आला भाग्यें विनटला । साधुचा अंकिला, हरिभक्त ॥३॥

सत्संगाच्या गोडीनें, सत्समागमानें, जनीं वनीं, आत्मतत्वीं हरीच दिसुं लागला

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्वीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP