मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|श्री ज्ञानेश्वरविजय|समाधि प्रकरण| अध्याय सहावा समाधि प्रकरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा उपसंहार समाधि प्रकरण - अध्याय सहावा निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे. Tags : niranjan madhavpoemsongकवितागाणीनिरंजन माधव अध्याय सहावा Translation - भाषांतर आज्ञापिती विठ्ठल रुक्मिणीसी । हे भक्त माझे असती उपासी ।याकारणें भोजन आजि द्यावें । मिष्टान्न यां योग्य जवें करावें ॥१॥अवश्य आज्ञा म्हणवोनि माथां । वंदोनियां पाय म्हणे समर्था ।तूं इच्छितां सर्वहि याचकाळीं । होईल त्रैलोक्यजना दिवाळी ॥२॥पाचारिले तैं विधि-विश्वकर्मे । सांगीतली त्यांप्रति हेचि कर्मे ।शाला रचाव्या अनुपम्यवाणी । कीं इच्छिती भोजन चक्रपाणी ॥३॥त्या कामधेनूसि जवें बलावा । सर्जावया सर्व पदार्थ लावा ।गंगादि आणा सरिता उदंडा । वाहोत नाना रसपूर्ण गोडा ॥४॥भुजंगप्रयात.दहीं दूध लोणी घृतासाखरेच्या । मधूपेयसंयुक्त सर्वांरसाच्या ।फलें शाक सर्जावया कल्पवृक्षा । त्वरें बाहिजे गा विधी सर्वदक्षा ॥५॥सुवर्णादि पात्रार्थ चिंतामणीतें । त्वरे आणिजे स्वर्गिचा आजि येथें ।रचा सर्व रांगोळिया रत्नदीपा । करा कुंकुमें चंदनें सेक लेपा ॥६॥करा आयितिं सर्व तात्काळ येथें । भुकेले पहा पंढरीनायकातें ।पहा भक्त सर्वस्व माझे भुकेले । ययां पाहिजे पूर्ण संतृप्त केलें ॥७॥बरे मेळवा शीघ्र दिक्पाळ तेही । यथायोग्य कामास योजा तयांही ।त्वरें आळवा त्या शचीनायकातें । ययां वाढण्या अप्सरां बायकांतें ॥८॥तयांनी तदां तोचि आदेश माथां । त्वरें वंदिला तैं स्त्रजी विश्वकर्ता ।विचित्रा विशाला महारम्य शाला । मणिस्तंभयुक्ता जशा त्या तशाला ॥९॥महादीप पीठावळी रत्नताटें । तशा आडण्या तोयपात्रासि नेटें ।बहु वाटिया पान पत्रें उदंडें । तदां सर्जिली विश्वकर्मे प्रचंडे ॥१०॥तदां पातल्या अप्सरा दिव्यनारी । धुरा देवपत्नी शची मुख्य सारी ।ऋषींच्या तशा सुंदरी देवमाता । पुढोरोनियां मीनल्या त्या समर्था ॥११॥तदां देखिलें सर्वही सिद्ध आहे । नये भीमकी पांडुरंगासि बाहे ।तुम्ही ऊठिजे भक्तिवृंदासमेतें । करावी त्वरा स्नानसंध्या समस्तें ॥१२॥महातीर्थ इंद्रायणी पुण्यदात्री । समस्तीं तदां स्नान केलें पवित्रीं ।दिठि देखिलें दिव्य वैकुंठ तेंही । नसे यापरीं मुख्य वैकुंठ तेंही ॥१३॥तदां पाहिल्या लोचनी दिव्यशाला । महाश्रेष्ठ चिंतामणीच्या विशाला ।बर्या निर्मिल्या दिव्यपंक्ती अपूर्वा । दिशा साधिल्या उत्तरा आणि पॄर्वा ॥१४॥जशा ज्यांसि त्या योग्य पंक्ती धराव्या । अहो ऊर्ध्व संन्यासियांते कराव्या ।अहों अग्निहोत्र्यांसि हे पंक्ति द्यावी । महायागदीक्षावतां हे असावी ॥१५॥महां सोमपी याच पंक्ती बसावे । बरे श्रोत्रिये या स्थळी बैसवावे ।महोदार जे तापसी वानप्रस्थ । तयां योग्य हे पंक्ति आहे प्रशस्त ॥१६॥अहो ब्रम्हचारीजनी या वळीतें । सुखें बैसिजे ठाव हा योग्य यातें ।अहो भक्तसाधू-समाधानवंता । यथें बैसवा साधुबुद्धी समस्तां ॥१७॥दयाळू सदां पोषिते जे परांचे । पहा साधु हे कोवळे या मनाचे ।सदां सिद्ध जे दीनसंरक्षणातें । तया आणिजे श्रेष्ठ पंक्तीस येथें ॥१८॥महीदानद्ते महोदार लोकीं । महाकर्मकर्ते मठाराम जे कीं ।करावें हरी तोषणाच्याच व्याजें । तयां सज्जना पंक्ति मोठी विराजे ॥१९॥महाधीर वैराग्यसंपन्न आले । उदासीन सर्वांस्थळीं साच झाले ।विरिंच्यादि लोकांत नाहीं सुखाशा । तयां बैसवा श्रेष्ठपंक्ती नरेशां ॥२०॥नवाही प्रकारांतरें भक्तियोगें । मला वश्य केलें जयांनी निजांगें ।जयांला नसे या जगीं अन्य जोडा । तयां भक्तवर्गासि हे पंक्ति मांडा ॥२१॥महाभक्त मौनी महायोग्य सिद्ध । हरी लक्षिती सर्वभूतीं प्रसिद्ध ।अशा सज्जना थोरली पंक्ति योजा । म्हणे रुक्मिणीनाथ देवाधिराजा ॥२२॥दिसे सन्मुखी मी समस्तांसी तोंडा । अशा मध्यदेशीं अम्हां पात्र मांडा ।अम्हां सन्निधीं ज्ञानिया पुंडलिका । कर ठाव ते दूर मातें न लेखा ॥२३॥तदां उद्धवाक्रूरपार्थादिकांहीं । हरीच्या मतें दिव्यपंक्ती तयांही ।बर्या निर्मिल्या योग्य त्यांते बसाया । नसे ठाव कोणासि कांही रुसाया ॥२४॥बलावा त्वें भोजना भक्त माझे । हरीची ऊसी श्रेष्ठ आज्ञा विराजे ।तदां सर्व पाचारिला भक्तमेळा । त्वरें चालतील क्षिती रम्यशाला ॥२५॥यती बोलती तैं उगरोनि दंडा । तयां अप्सरातें तुम्ही मार्ग सोडा । अम्ही सोवळे जातसों भोजनातें । तुम्ही दूर व्हा पुंश्चली अन्यपंथे ॥२६॥तदां बोलती अप्सरा यांसि रागें । कसे सोंवळे अंतरी भेद जागे ।यती ही असा ते क्षमा मुख्य नाहीं । कशाला शिखा टाकिल्या क्रोधियांही । तदां ते यती बोलती त्यांसि तोषें । नसे भेद भूतीं अम्हाम ब्रह्म भासे ।तथापी जनाचार रक्षावयातें । अम्ही तजितों या जगा निस्पृहत्वें ॥२८॥असें ऐकतां वंदिती पादपद्मा । त्वरें जायिजे भोजना देवसद्मा ।असा सोहळा मांडला थोर जेथें । हरी वर्ततां न्य़ूनता काय तेथें ॥२९॥तदां बैसलें सर्वही एकमोरे । हरी लक्षिती सर्व नेत्रासमोरे ।तदां वाढण्या घेतलें देवतांही । शची मेनका ऊर्वशी मुख्य त्यांही ॥३०॥त्वरेनें अरंभा म्हणे दिव्य रंभा । घृताची घृताच्या धरी रत्नकुंभा ।जना वाढिते दाविते कौशलातें । अशा सिद्ध देवांगना सर्व तेथें ॥३१॥वाढण्या पातल्या सर्व पात्रीं । तदां पात्र गुंडाळीती अग्निहोत्री ।अम्ही काय या गोंधळी आजि आलों । कसें जेविजे या स्थळी भ्रष्ट झालों ॥३२॥महा पूंश्चली अप्सरा कामचारी । अह्मां वाढिती हे नव्हे गोष्टि भारी ।तदां हांसती पूसती त्या तयांतें । तुह्मी मानितां काय मोठ्या भयातें ॥३३॥तुह्मी याज्ञिकीं यज्ञ काशासि केले । अह्मां कारणें वेद ते वेंच केले ।अह्मांलागि कंटाळतां आजि येथें । उद्यां पादसेवार्थ पावाल तेथें ॥३४॥अह्मी सर्व देवेश्वरां मान्य कां विटाळा । मनीं स्वर्गिची वासना मुख्य टाळा ॥३५॥ऋषीराय आम्हांचि पासोनि झाले । अह्मी हे ऋशी सर्वही शुद्ध केले ।अह्मांपासुनी वंश क्षत्रियांचे । प्रसिद्धीस आले शशीभास्कराचे ॥३६॥अम्ही नाहलों या जळीं सुद्ध झालों । हरीतीर्थ इंद्रायणी तोय प्यालों ।अम्हा काय धिक्कारितां व्यर्थवाणी । त्यजा भेदबुद्धी भजा चक्रपाणी ॥३७॥तदां हांसती अन्य देखोनि त्यांतें । हरीपंक्तिचे भेद बुद्धिस्थितांतें ॥३८॥असा गलबला ऐकतां चक्रपाणी । वदे धातया ऐक तूं रम्यवाणी ।स्वपंक्तीस पाहोनियां देवताहीं । बरें वाढितां घोळ होणार नाहीं ॥३९॥धरी मस्तकीं श्रीशाआदेश धाता । करी योगिनीलागिं आज्ञा समस्ता ।स्वपंक्ती तुह्मी वाढिजे तोषमानें । तदा श्रीपतिलागि हें कृत्य माने ॥४०॥तया मुख्य स्वाहा स्वधा याज्ञिकांतें । बर्या वाढिती तोष चित्तें स्वहस्तें ।महायोगसिद्धी तयां योगियांसी । तपोसिद्धि त्या वाढिती तापसांसी ॥४१॥समर्था महामोक्षसिद्धी यतीतें । तदां नीघती उत्सवें वाढण्यातें ।वनस्थांसि त्या ब्रह्मलोकांत-सिद्धि । महासाक्षपें वाढिती श्रेष्ठबुद्धी ॥४२॥व्रतस्थांसि त्या पुण्य-सिद्धि समस्तां । तयाम तीर्थिकां तीर्थसिद्धी प्रशस्ता ।तयां स्वर्गकामी जना अप्सरांहीं । बरें वाढिलें प्रीति पावोनि तेही ॥४३॥यया वारिती भीमकी सत्यभामा । अह्मी वाढितों भक्तवृंदा महात्मा ।अशा पट्टराणी हरीच्या समस्ता । निघाल्या तदां वाढण्यातें प्रशस्ता ॥४४॥बरीं लोणचीं रायतीं दिव्यशाखा । महारम्य कोशिंबिरी त्या अनेका ।वरान्नें बरीं सोलिवां मुद्गदाळी । सुगंधे सुवर्णाकृती पीत झालीं ॥४५॥मुदा ओदनाच्या महाउष्ण वाफा । सुगंधासि घेवोन येती अपापा ।जशा कुंदजातीकळ्या त्याप्रमाणें । शितें शोभतीं ते शरच्चंद्रवर्णे ॥४६॥पहा भक्ष्य लाडू किती साखरीचे । भले लोटले पूर नानापरीचे ।वडे सांडगे पापडांच्या सुरासी । महापात्र तें वाढती सावकाशीं ॥४७॥खिरी कामधेनूदुधें आळवील्या । बर्या रायपूरीं सिता मेळविल्या ।बहू वाढिल्या रत्नपात्रीं अनेकीं । सुधा स्वर्गिची जिंतिति याच लोकीं ॥४८॥तयां पात्रपात्रांसि चौसष्टि वाट्या । समस्तां रसीं दाटल्या फार मोठ्या ।कढी तूप दूधा दह्यांच्या निराळ्या । बर्या क्षीर-सायीभरें पूर्ण केल्या ॥४९॥अनेकांपरीं तक्रनिंबूरसांनीं । कितीं दाट संमिश्र ते शर्करेनी ।बहू जातिच्या भिन्न पक्वान्नजाती । तयांचे पहा ये स्थळीं पूर जाती ॥५०॥तदां पाहती लोचनीं स्वर्गवासी । अह्मी एक सेवोनि जाणों सुधेसी ।तिया एक गोडीत दूजें कळेना । अम्हां मानवी-सौख्य देवां मिळेना ॥५१॥पहा षड्रसें भक्षिती भिन्नभिन्न । रुची चाखती तोषती नित्यपूर्ण ।असे अन्न यांते अनंता प्रकारीं । हरी निर्मितो धन्य हे भूमिचारी ॥५२॥सुगंधोदकें स्वच्छ इंद्रायणीचीं । बरी भाविलीं केतकीपाटलींचीं ।उशीरादि कस्तूरिका चंपकाहीं । बहू शीत संस्कारिली चातुरांहीं ॥५३॥अह्मी वंचलो जन्मलों स्वर्गलोकीं । कशाकारणें राहतो व्यर्थ नाकीं ।कधीं हें सरे पुण्य़ जाऊं धरेसी । भजूं पांडुरंगासि या भावनेशीं ॥५४॥महाभक्त साधूंचिया दिव्यपंक्तीं । अम्ही मान्य होऊं कधीं कोण युक्ती ।करावी, असा निर्जरां काम वाढे । असे मृत्यूलोकीं जना सौख्य गाढें ॥५५॥अम्ही मानवी जन्म घेवोनि यावें । सुखें या अशा भोजनातें करावें ।असे इच्छिती स्वर्गिचे देव सारे । मनी थोर आशा तयां या प्रकारें ॥५६॥असा सोहळा सर्व लोकांसि झाला । समस्तांसि देवें परामर्ष केला ।तदां ज्ञानदेवा निवृत्तीस पाहे । पुढें मुक्ति सोपान चौघांसि बाहे ॥५७॥तयां बैसवी सन्मुखी स्वर्णताटीं । हरीला जयां देखतां प्रीति मोठी चतुर्भूज मूर्ति द्विजां दोंभुजांच्या । स्वरुपा पुजी प्रेम ठायीं जयांच्या ॥५८॥तयाचें पद क्षाळिलें तीर्थ माथां । धरी प्रेमभावें त्रिलोकासि धर्ता ।महामंदिरी सिचिलें सर्वठायीं । ह्मणे मूळ संपत्तीचे हेचि पाही ॥५९॥मुखीं प्राशिलें तैं म्हणे धन्य झालों । सुधा अक्षयी आजि मी साच प्यालों ।अहो ब्रह्मपादांबु हें सोमपाना । असे तुल्य मी हें म्हणे सत्य जाणा ॥६०॥फुलें तूळसीचीं दळें विप्रमाथां । गळां हार नाना फुलीं लोकभर्ता ।उटी चंदनाच्या सुगंधा बुक्यांनी । पुजी देव हा ब्राह्मणा चक्रपाणी ॥६१॥म्हणे इंदिरा-मेदिनीचा पती मी । जयांच्या प्रसादें असे पूर्ण कामी ।सुरां रक्षितों शिक्षितों दैत्यनाथां । असे सर्व सामर्थ्य हे विप्रसत्ता ॥६२॥असें देव सर्वासि बोलोनि राहे । करें सर्व संकल्प तैं सोडिताहे ।असे एक विष्णु जगद्रूप सारा । महद्भूत त्या सर्व पावो उदारा ॥६३॥असा दिव्य संकल्प सोडी हरी तो । समस्ता किर्या पूर्ण जो कां करितो ।असी दावितो या जना रीति सारी । स्वयें आचरे लोककर्ता मुरारी ॥६४॥तदां जेविती भक्त संतुष्ट सारे । हरी आमुचा अन्नदाता कसारे ।अम्हां दीधलें आजि हें पोट सानें । कसीं साठऊं यांत हे उत्तमान्नें ॥६५॥अम्हां तोंड मध्यें कशालागि झालें । अहा मस्तकीं धातयानें न केले !! ।उगें टाकितों ऊर्ध्वपंथेचि गोळे । कितीं जन्मिचें पुण्य होते उदेलें ॥६६॥हरि पंक्तिचा लाभ आम्हांसि झाला। कितीं जन्मिंचा भाग्य - भानू उदेला ।पुन्हा मृत्यु संसार कांही अम्हांतें । नसे निश्चयें मानलें या मनातें ॥६७॥असें चिंतिति जेविते लोक सारे । बहू जेविले तोष पोटीं न थारे ।सुखी सर्वदां श्रीनिवासासि गाती । मुखीं श्लोक उच्चारिती रुप ध्याती ॥६८॥जया जें रुचे तेंचि मागोनि घेती । सदां सर्वदां त्या रसीं तृप्त होती ।असे जेविले षड्रसें कृष्ण पांती । सुतोषें आनंत कल्पांत ठाती ॥६९॥असे जेविले भक्त ते कौतुकानें । तयां तृप्ति आनंत कल्पांत माने ।अशा जेवणीं भूक राहील कोठें । जरी वाढवीलें तरी पोट मोठें ॥७०॥विडे पुष्पमाळादिकें अष्टगंधे । बहू धूपधूमें विचित्रें सुगंधें ।तदा ते सभा बैसली वैष्णवांची । ध्वनी दिव्य गांधर्व सद्गायनाची ॥७१॥तदां अप्सरा नाचती ताळघोळें । विणे सालरी सन्मृदंगे विशाळें ।फुलें वर्षती पाहती दिव्य व्योमीं । कसा तिष्टतो भक्तवृंदांत स्वामी ॥७२॥अळंकापुरीं हा महोत्साह झाला । असा तुष्टला सर्वही भक्तमेळा ।हरी राहिले जोंवरी क्षेत्रदेशीं । असा नित्य सन्मान भक्तोत्तमांसी ॥७३॥तदां फुंदतां पाहिला एक नामा । रडे अश्रुनेत्रीं करी खेद तो मा ।तदां रुक्मिणी बोलिली श्रीधरातें । अम्ही मांडिलें ताट या नामयातें ॥७४॥न जेवीच नामा तुझी वाट पाहें । तयां जेववी तो जसा पूर्ण धाये ।तदां विठ्ठलें बाहिलें नामयातें । पुढें आणिलें चांगले ताट त्यातें ॥७५॥महादिव्य मिष्टान्न वाढोनि आणी । सती रुक्मिणी भक्तिप्रेमखाणी ।करें घास घालीं मुखी नामयातें । बहू सांतवी थापटी पाठि हातें ॥७६॥हरी़च्या करें शेष हें वैष्णवांचें । किती वानिजे भाग्य या नामयाचें ।निजांकी तया बैसवी नामयासी । मुखीं कूरवाळी बुझवी तयासी ॥७७॥असा जो लळा पाळितो सज्जनाचा । असे माय हा बाप सर्वांजनाचा ।अळंदीस उत्साह नारायणानें । असा दाविला भक्तवृंदासि तेणें ॥७८॥महा तोष पोटीं तयांते न माय । अम्हां जोडले धन्य देवेशपाय ।असा सोहळा जन्म कोट्यानकोटी । तपा अर्जितां तैं मिळे देवभेटी ॥७९॥॥ इति श्रीज्ञानेश्वरविजयमहाकाव्ये समाधिवर्णने भोजनविलासकथनं नाम षष्ठोध्याय: N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP