मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३|
ग्रंथाचा उपसंहार.

धर्मसिंधु - ग्रंथाचा उपसंहार.

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.


या धर्माब्धिसार ग्रंथांत पहिल्या छेदांत कालाचा सामान्य निर्णय सांगितला. दुसर्‍या परिच्छेदांत विशेषतः कालनिर्णय सांगितला. तिसर्‍या परिच्छेदाच्या पूर्वार्धीत गर्भाधानादि संस्कार, आह्निक, आधान इत्यादि सविस्तर मिश्र विषय, देवप्रतिष्ठा, शांत्यादिक व नित्यनैमित्तिक कर्मे इत्तके विषय सांगितले. तिसर्‍या परिच्छेदाच्या उत्तरार्धात जीवत्पितृकाचा निर्णय, श्राद्धाधिकार, काल इत्यादिकांचा निर्णय, श्राद्धपद्धति, सूतकादिकांचा निर्णय, दुर्मरण असतांही निर्णय, अंत्येष्टिसंस्कारादिविधि व विस्तारसहित संन्यास असे विषय सांगितले. विद्वानांच्या संतोषार्थ व शास्त्रव्युत्पत्ति नसणार्‍या अज्ञान्यांचे शास्त्राज्ञानुरुप कष्ट दूर व्हावे म्हणून या ग्रंथांत प्रायश्चित्त, व्यवहार व सर्व दानांचा विधि, याशिवाय सर्वही धर्मशास्त्रार्थ संक्षेपतः सांगितला आहे. मूळचे श्लोक क्वचित् क्वचित् अशुद्ध असल्यानें या ग्रंथांत कित्येक नवेही श्लोक शुद्ध करुन लिहिले आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP