मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
तिसरे पुनरुपनयन

धर्मसिंधु - तिसरे पुनरुपनयन

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


एका वेदाचे अध्ययन केल्यावर दुसर्‍या वेदाचे अध्ययन करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक वेदाचे अध्ययनाचे वेळी पुनरुपनयन करावे असे काही ग्रंथकार म्हणतात. अन्यवेदी असतील त्यांना ऋग्वेदाचे अध्ययन करणे झाल्यास पुनरुपनयन करावे असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. एकाच उपनयनाचे योगाने तीन वेदांचे अध्ययन करण्यास अधिकार येतो; अथर्व वेदाचे अध्ययनाला मात्र पुनरुपनयन करावे असे कोणी ग्रंथकार म्हणतात. यावरून ऋग्वेद आदिकरून तीन वेदांचे अध्ययन करणारे अथर्व वेदाची 'मुण्ड, माण्डूक्य इत्यादि' उपनिषदे पठण करतात त्यासंबंधी विचार केला पाहिजे. एकदम अनेक वेदांचे अध्ययनाला आरंभ केला तर उपनयनांची आवृत्ति करण्याची जरूर नाही, करिता एक उपनयन झाल्याबरोबर सकळ वेदांचे अध्ययनाचा आरंभ सिद्ध होतो असेही कोणी ग्रंथकार म्हणतात. यावरून एका वेदाचे अध्ययन झाल्यानंतर ज्या दुसर्‍या वेदाचे अध्ययनाची इच्छा असेल त्यामध्ये सांगितलेल्या विधीप्रमाणे उपनयन करावे. त्यामध्ये वपन ब्रह्मोदन, मेधाजनन व दीक्षा ही कृताकृत आहेत. परिदानाने क्रिया समाप्त होते. एका उपनयनाचे ठिकाणी अनध्यायादिक असल्यामुळे कराव्या लागणार्‍या दुसर्‍या प्रकारच्या पुनरुपनयनाचे ठिकाणी काहीही न गाळता सर्व विधि उक्त काली करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP