मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|सुभद्राचंपू| सर्ग सहावा सुभद्राचंपू सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चौथा सर्ग पांचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सुभद्राचंपू - सर्ग सहावा निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे. Tags : niranjan madhavpoemsongकवितागाणीनिरंजन माधव सर्ग सहावा Translation - भाषांतर वर्षाकाळ समस्तही निरसला आला शरत्साजिरा ।झालें अंबर शुध्द मंदगतिनें वायू फिरे गोजिरा ।तत्काळोद्भव सत्फळें सुकुसुमें भारें तरु डोलती ।सस्यें शोभित दीसते वसुमती संफुल्लल्या मालती ॥१॥झालीं निर्मळ तें सरोजसहितें पद्माकरें पावनें ।येती दिव्य मरालवृंद करिती सेवावया धावनें ॥पर्वी पूर्णराशी चकोरकगणा योजी सुधापारणें ।आले षट् पद तैं परागपर ते सत्पक्षझंकारणें ॥२॥झाले स्तब्ध शिखी सुखी घडुनियां अर्थीजनांचेपरी ।पाहा शोभति शावलें हरित ते श्रीमंत तैसे गिरी ।झाल्या त्या सरिता कृषा रसयुता स्वंछांबुसंधारणें ॥लोका लंघनशक्य त्या विलसती शैत्यादिसर्वागुणें ॥३॥नाना नव्यतृणें वनीं मृगगणें सेवोनियां पुष्ट ते ॥जैसे नूतनसंपदामदभरें सानंदलें दुष्ट ते ॥कामार्थी करिताति युध्द अपुल्या जातींत कामाथिले ॥ते दुर्वृत्त मदोध्दतांसम पहा ग्रामीणसे मातले ॥४॥औदार्योन्नत दंभवंत करिती देतां जन गर्जना ॥तेव्हां पावति कृष्णता अपयशें मालित्य ये त्या जना ॥तेहीं सज्जगसंगलाभ घडतां शुध्दाकृती पावती ॥तैसे मेघ शरत्समागमवशें मौनें शुची राहती ॥५॥जाती ते व्दिज निड टाकुनि तसे सव्दिप्र तीर्थाटणा ॥राजे जैत्ररथावरोह करिती शत्रुचिया शासना ॥वाणिज्यार्थ वणिग्जनी वृषगणीं वाहोनि वस्तू बर्या ॥नेती उद्यमलाभ इच्छुनि मनीं स्वच्छंद देशांतरा ॥६॥जाती स्वस्थकुलांगना पतिकुळा सौभाग्यकामी सती ॥क्षत्री भूपतिसेवनार्थ निघती त्यागोनि गेहाप्रती ॥व्यापारी रत सर्व जीव घडती येतां शरत्सांवळा ।भिक्षू निस्पृह ते गृहस्थ वसती संत्यागिती त्या स्थळा ॥७॥मागें अर्जुनही निरोप सहजी तोषें हळीकारणें ॥झालें रक्षण या तनूस अपुल्या सप्रेमसंरक्षणें ।आम्ही निस्पृह फार दीस न वसों गेहीं गृहस्थांचियां ॥तेणे लोप अवश्यमेव घडती नेमासि संन्यासिया ॥८॥झाले मार्ग समस्त निर्मळ, तृणें ते कोमलें वाढलीं ॥जीवांची अतिसूक्ष्म पंक्ति समुदी सल्लीनता पावली ॥झालें अंबरही निरभ्र सरला अंधार हा दुर्दिनीं ॥भानूहीं स्वकळा प्रसन्न सकळा संपन्न हिंडे जनीं ॥९॥ऐसें ऐकुनि राम त्याप्रति वदे स्वामी कृपासागरा ॥केली मान्य गिरा म्हणॊनि घडला हा लाभ ग्रेहातुरां ॥आहे रैवतपर्वतोत्सव उद्यां कीजे समस्ता जनीं ॥दृष्टीं या निरखोनि साच करिजे प्रस्थान आल्या मनीं ॥१०॥केलें मान्य यतीश्वरें बहुबरें संतोषयुक्तांतरें ॥आज्ञापी स्वपुरीत राम सुजना आतां चला सत्वरें ॥श्रीकृष्णाहुक देवकोद्भव तथा अक्रूर तो सात्यकी ॥तेव्हां आनकदुंदुभीसह निघे योषिद्रणीं देवकी ॥११॥कृष्णांत: पुर सर्व सिध्द घडले नारीमणी रेवती ॥सार्या यादवदेवराज महिषी सद्भूषणीं शोभती ॥छत्रें चामर दासिकासह महा आनंदल्या वैभवें ॥ज्यातें देखुनि देवलोकवनिता लाजोनि जाती जवें ॥१२॥काहीं हेममणीविराजितरथीं आरुढल्या साजिर्या ॥कांहीं त्या शिबिकादि दिव्य वहनीं त्या शोभजेल्या बर्या ॥भेरी झांकृति दुंदुंभी रवभरें संनाद कोंदाटला ॥लोकाचा बहुसाल तो गलबला दाहीं दिशा व्यापला ॥१३॥सुभद्रा भद्रांगी मणिरहिंवरी ते वळघली ॥निघाली लक्ष्मीसी जलनिधि जळापासुनि भली ॥समस्तालंकारें खचित दिसते हेमपुतळी ॥जशी रत्नस्तोमीं कुशलविधिनें रम्य घडिली ॥१४॥महावीरांचेंही निजगुणाविलासें मन हरी ॥दिसे हें सौंदर्यांबुधिजनित लावण्यलहरी ॥मुखांभाजीं यीच्या तरुणनयनाली झगटती ॥तदां नासा चंपा कुसुमवर दर्पें मुरडती ॥१५॥सुभद्रा दे सज्जीकृत रथ तया हंसमणिला ॥असे लक्षामध्यें अनुपम महावीर गणिला ॥स्त्रियांच्या संदोहीं यतिवर निघे दंडधर तो ॥१६॥पुढें मागें सारे रणचतुर रे शूर निघती ॥पदातीहीं हातीं अमित परि शस्त्रें परिजिती ॥महासेना साजे अतुळ चतुरंगे बळवती ॥बलाध्यक्षामागें तरुण रणवेत्ते मिरवती ॥१७॥पुढें श्रीकृष्णासीं करि गमन तालांक गजरें ॥तदां व्दारी व्दारावतिस तरि तो मार्ग न सरे ॥नरांचे नारीचे गण निरखिती वैभव दिठीं ॥जयांच्या चिताची पडलि हरिपायीं दृढ मिठी ॥१८॥टाकोनियां नगर ते निघती जवानें ।जे दृप्त सर्व घडले निज वैभवानें ॥इंद्रादिकां न गणिती यदुवीर गाढे ।ज्यांची असी हरि- परिग्रह दीप्ति वाढे ॥१९॥कांहीं दूर पुरी त्यजोनि निघतां पाहोनि मागें पुढें ।वीरांतें निरखोनिहीं विरळसें तैं सज्ज हाहीं घडे ॥आणी स्यंदन तो समीप मिरवे जेथें सुभद्रा सती ।देतां हस्त ततक्षणीं वळघली या अर्जुनाच्या रथीं ॥२०॥दिल्हा तो ढकलोनि सारथि घडे हे वासुदेवी स्वयें ।अश्वाचे वरदोर धारण करी जे चालवी निर्भयें ॥तेव्हां तो रथ काढिला द्रुतगती टाकोनि सर्वां जनां ॥झाला अर्जुन चाप बाण धरुनी सन्नध्द युध्दांगणा ॥२१॥जैसा तो मृगराजा भाग अपुला स्वात्मप्रतापें हरी ।तैसा तो कुरुवीर अर्जुन बळें ने तो रथीं नोवरी ॥तेव्हां एकसरेंचि तो गलबला अंत:पुरी माजला ।संन्यासी असतां हरोनि पळतो देवी सुभद्रा तिला ॥२२॥आक्रोशें अति अट्टहास करिती नारी पंथी विव्हळा ।तो कोलाहला भूमि - अंबर - दिशागर्भांत कोंदाटला ॥नेली त्या यतिनें पहा गुणवती कैसी सुभद्रा सती ।नारी पीटिति भाळ वक्ष म्हणती कैं राम कैं श्रीपती ॥२३॥तेही काय म्हणोनि भिक्षुकरथीं आरुढली सांप्रती ।जे कां शीलवती महाशुभमती मानीत होतों किती ॥आहा स्त्रीचरितीं नव्हे परगती देवादिकांही अती ।एकांतीं मतली तयास सुदती गेली तया संगती ॥२४॥ऐसें ऐकुनि वीररक्षक मनीं होवोनियां घाबिरे ।तेव्हां पाहति भोंवते तव यती नेतो सुभद्रा त्वरें ॥पाठीं धांवति फीर फीर म्हणती शस्त्रास्त्रवेत्ते बरे ।जैसा सागरपाट एकसर तो लोटे मही ना धरे ॥२५॥आक्रोशें म्हणती यती कुळवधू तूं कोण नेसी असा ।हे तूला नकळे कसी हरिसि तूं श्रीकृष्णजीची स्वसा ॥कैसा राम तुला उपेक्षिल खळा आम्हांपुढें तूं तरीं ।कैं जाऊं सकसील वांचुनि तरी घेवोनि हे नोवरी ॥२६॥आतां तों तव मानभंग करणें आला अम्हां रोकडा ।संन्यासी म्हणवोनि वंदन करुं बांधोनि नेऊं मुढा ॥हे आहे बळिराम - कृष्ण भगिनी भिक्षू तुला हे कसी ।कन्या प्राप्त घडेल नेणसि कसा तूं आपुल्या मानसीं ॥२७॥हे नोहे वनिता असे बडिश रे मछापरीं भिक्षुका ॥तूझे प्राण हरील मायिक तुला कैशी जिरे क्षुल्लका ।आतां तूं न करी विलंब सुदती टाकोनि दे तूं पळे ॥नाहीं तैं तुज राम दंडिल बरा दंडी म्हणे ना बळें ॥२८॥सांगे तूं तरि नाव काय अपुलें नेसी वधू कासया ।सोन्यासी म्हणवोनि वेषधर तूं आलासि गावास या ॥जासी घेऊनि काय ईस हरिच्या लंघोनिया शासना ।पृथ्वी ते तुज ठाव देइल कशी आणी विचारें मना ॥२९॥या भूमीवरि वाव तो तुज नसे जाशील स्वर्गाप्रती ।तेथें इंद्र करील रक्षण तुझें हें ना घडे दुर्मती ॥तेव्हां दिक्पति काय तूज करिती ते निर्बळी रक्षणा ॥आतां प्राणचि मात्र घेउनि पळें स्त्री- चोरटया दुर्गुणा ॥३०॥रामानें तुज पूजिलें प्रणमिलें प्रेमें घरीं ठेविलें ।चार्तुमास्यजळागर्मीं तुज कसें सानंद संरक्षिलें ।त्यांचा तां उपकार शीघ्रचि तुवां निस्तारिला दीसतो ।ऐसा दुर्मति तूं कृतघ्र तुजला जावा कसा दीसतो ॥३१॥तेव्हा तो रणधीर अर्जुन म्हणे नोहे यती मीं सती ।माझी म्यां हरिली वदा त्वरित जा त्या रामकृष्णाप्रति ॥आहे पांडव - धर्मबंधु वरितों मन्मातुळाची सुता ।माझा भाग यथार्थ हो परिसिजे आहे विधी नेमिता ॥३२॥आहे मीं समरीं उभा जरि तुम्हां युध्दी असे वासना ॥या सज्जोनि पहा पराक्रम तरीं लावीन मी शिक्षणा ।आहे गौतमशिष्य मी परिसिजे शस्त्रार्थवेत्ता जगीं ।आहे फाल्गुन मी बुझा निजमनीं शंका त्यजा वाउगी ॥३३॥ऐशी अर्जुनभाषिता शुभ गिरा ऐकोनियां वीर ते ।झाले कीं पुरुषार्थहीन समरीं घेतीच ना धीर ते ॥जैसा तो मृगराज नाद करितां क्षुद्रां मृगांच्या गणा ।प्राणा अंत घडे तसा मदगिरी यांचा घडे ठेंगणा ॥३४॥झाले अर्जुन नांव ऐकुनि तदा साशंक चित्तांतरीं ।याचा मित्र असे यथार्थ परिसा श्रीकृष्ण याचे शिरीं ॥त्याच्या तों विवराविना हरिल हा हे नोवरी ना घडे ।यासीं युध्द करुं तरी न करितां संकष्ट दोहीं कडे ॥३५॥आतां जाणविजे त्वरेंकरुनियां त्या रामकृष्णाप्रती ।नेताहे यति दंडधार तुमची जे कां स्वसा सन्मती ॥आहे अर्जुन नाम हेचि कथितो सांगे पृथानंदन ।मीं नेतों मम भाग मातुळसुता साध्वी समाना गुणें ॥३६॥आहे तो स्थिर वीर सज्जुनि उभा अंकी असे नोवरी ।त्याच्या प्रेमपुर: सरें धृतिमती सामथ्यकर्मा करी ॥आतां आय तयासि जिंतुनि रणीं बांधोनियां आणिजे ।कीजे काय उपाय यावरि तयां आज्ञा कसी पूसिजे ॥३७॥ऐसा दीर्घ विचार वीर करुनी सांगावया पातले ।जेथें श्रीपति - राम - मुख्य असती लज्जाभरें आतले ॥तैं हे रैवत पावले तंव घडे आकांत मार्गीं असा ।सांगाया प्रति धींवसा न पुरवे शूरांचिया मानसा ॥३८॥इति श्री सुभद्रास्वयंवरे चंपुकाव्ये शरत्काळवर्णनं सुभद्राहरणं नाम षष्ठोध्याय: ॥ N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP