प्रसंग सातथा - ईश्र्वर पित्‍याच्या विसर

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐसाच संसारव्यापें व्यापला । तो संसारव्यापेंचि भक्षिला ईश्र्वरपित्‍यालागीं विसरला देह अभिमान गुणें ॥१३॥
प्रकृति स्‍वार्थबुद्धीची ज्ञानें । माझें माझें म्‍हणती अज्ञानें । मृगजळास देती आलिंगनें । मूर्ख वाद धरूनियां ॥१४॥
मृगजळें झळया पळती । जनांस बोलतां माझे भार तोलती । तरी खदखदां शहाणे हांसती । मूढ वेडे म्‍हणोनियां ॥१५॥
तैसें जनसंतानाचें माझेंपण । देखोनि हांसती ते साधुजन । म्‍हणती मिथ्‍या नाउलें हें अज्ञान । यालागीं ज्ञान सांगती ॥११६॥
जैसें निजेलें बरळे चोराचियां भेणें । दटावला सावध होता त्‍यानें । तैसे भ्रमिष्‍टास आत्‍मज्ञातेपणें । साधु हेडावतील ॥१७॥
जैसीं स्त्रीच्या शिंदाळाचीं पोरें । उजविली विहित्‍या भ्रतारें । शिंदळशिंदळीसी वाटे बरें । याची न होती म्‍हणोनियां ॥१८॥
तदन्याय या जनाचा परियेसा । माझे म्‍हणोनि कवळी दाही दिशा । दृष्‍टी देखतां होतसे निराशा । डोळे झांकुनी आंधळे होती ॥१९॥
एका दृष्‍टांताचें बहुत दृष्‍टांत । सांगतो सद्‌भेदाची मात । वेगळाले बोलणें बोलाविरहित शेख महंमद सांगे ॥२०॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP