मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचसमासी| समास ४ पंचसमासी समास १ समास २ समास ३ समास ४ समास ५ पंचसमासी - समास ४ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ समास ४ Translation - भाषांतर ॥ श्रीराम समर्थ ॥ मागां बोलिलें निरूपण । केलें पाहिजे साधन । तया साधनाचें लक्षण । ऐसें असे ॥१॥व्हावया ज्ञानाची प्राप्ति । आधीं केली पाहिजे भक्ति । भक्ति घडलिया मुक्ति । पाठी लागे ॥२॥मोक्षभुवन अतिसुंदर । आनंदरूप मनोहर । तेथें जावया विचार । ऐक बापा ॥३॥तेथें नऊ पायर्या उत्तम । ऐक पायरी प्रथम । जी चढतां तुटे श्रम । नि:शेष जीवांचा ॥४॥तें तूं गा श्रवण । करावें नित्यनिरूपण तया निरूपणाची खूण । ऐसी असे ॥५॥सज्जन आणि कृपाळू । ज्यास ज्ञान परिमळू । तया संगतीनें मळू । तुटे अज्ञानाचा ॥६॥अद्वैतचर्चा अखंड । जेथें नाहीं पाषांद । तये संगतीनें बंड । नुरे मीपणाचें ॥७॥श्रवण करावे ते ग्रंथ । जेथें बोलिला परमार्थ । शृंगार-श्रवणीं अनर्थ । नेमस्त आहे ॥८॥म्हणोनि तें त्यजावें । जेथें नाना युक्तिलाघवें । भक्ति ज्ञान वैराग्य भावें । घ्यावें आदरें ॥९॥नाना कथा चमत्कार । नवरसिक अपार । तें त्यजूनिया सार । अद्वैत घ्यावें ॥१०॥श्रवण केल्याचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तेणें करितां प्रांजळ । आत्मज्ञान होय ॥११॥सगुण सर्वोत्तमाचें ध्यान । करावें गुणानुवादन । हरिकथानिरूपण । करीत जावें ॥१२॥या नांव दुसरी भक्ति । ऐक तिसरीची स्थिति । सर्वकाळ आदरें चित्तीं । नाम असावें ॥१३॥चवथी पादसेवन । पांचवी असे अर्चन । सकळांचें करावें पूजन । विधीप्रमाणें ॥१४॥सकळवंदन सहावी । दास्यत्व ही सातवी आतां ऐका आठवी । भक्ति कैशी ॥१५॥सखा देवचि मानावा । अख्मड तोचि आठवावा । भार आभार घालावा । तयावरी ॥१६॥नववी ते अद्वैत जाण । करावें आत्मनिवेदन । विचार घेतां अभिन्न । मुळींच आहे ॥१७॥हें नवविध भजन । सायुज्यमुक्तिसाधन । तेणेंकरितां शुद्ध ज्ञान । प्राण्यास होय ॥१८॥शुद्ध ज्ञानाचे बळेम । अंतरीं वैराग्य प्रबळे । तेणें लिंगदेह मोकळें । होय वासनेसी ॥१९॥लागे स्वरूपानुसंधान । नाठवे देहाभिमान । विश्रांतीतें देखे मन । तद्रूप होय ॥२०॥आदिपुरुष एकला । नाहीं द्वैताचा गलबला । संगत्यागें अवलंबिला । शुद्ध एकांत ॥२१॥तेथें मन पांगुळलें । आपणास विसरलें । आपणास भुलोन गेलें । स्वरूपबोधें ॥२२॥मी कोण हें नकळे । अवघा आत्मा प्रबळे । तेणें बळें मन मावळे । कर्पूरन्यायें ॥२३॥तेथें शब्द कुंठित झाला । अनुभव अनुभवीं निमाला । आतां असो हा गलबला । कोणीं करावा ॥२४॥वाटे एकांतासी जावें । पुन: हें अनुभवावें । उगें निवांत असावें । कल्पकोटी ॥२५॥नमो वक्तृत्त्वउपाधि । पांगुळली स्वरूपीं बुद्धि । लागली सहज समाधी । हेतुरहित ॥२६॥गुरु शिष्य एक झाले । अनुभवबोधीं बुडाले । त्यांचे शुद्धीस जे गेले । तया तीच गति ॥२७॥तुटला स्मसारबंधू । आटोनि गेला भवसिंधू । बुडाला बोधीं प्रबोधू । विवेकबळें ॥२८॥ज्ञानाग्नि प्रगट झाला । मायाकर्पूर जळाला । विवेकें अविवेक ग्रासिला । तये ठायीं ॥२९॥झालें साधनाचें फळ । चुकलें जन्माचें मूळ । निष्कलंक आणि निर्मळ । तोचि आत्मा ॥३०॥दृढ बाणली आत्मस्थिति । मिथ्यत्वें मुरडली वृत्ति । सांगिजेल वर्तनगति । पुढील समासीं ॥३१॥ इति श्री० ॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP