एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


पुंश्चल्यापहृतं चित्तं, को न्वन्यो मोचितुं प्रभुः ।

आत्मारामेश्वरमृते, भगवन्तमधोक्षजम् ॥१५॥

पुरुष सदा स्त्रीअनुराग । परी सहसा न करवे प्रसंग ।

त्यासी पुंश्चलीचा घडल्या संग । ते बाधी निलाग हावभावीं ॥७५॥

पुंश्चलीचे कटाक्ष गुण । तेंचि पुरुषासी दृढ बंधन ।

स्त्रीकामबंधन सोडवी कोण । एक नारायणावांचूनि ॥७६॥

कामिनीकामापासूनि निर्मुक्त । कर्ता ईश्वर समर्थ ।

जो कां आत्माराम भगवंत । तोचि निश्चित सोडविता ॥७७॥

मायागुणें कामसंचार । अविद्या वाढवी साचार ।

मायानियंता जो ईश्वर । तो कामकरकर निर्दळी ॥७८॥

स्वस्वरुपीं रमण आराम । ऐसा जो कां आत्माराम ।

तो निवारी सकळ काम । करी निर्भ्रम निजात्मता ॥७९॥

जो भोग भोगूनि अभोक्ता । त्या शरण रिघाल्या अनंता ।

बाधूं न शके विषयावस्था । स्त्रीसंगीं सोडविता तो एक ॥१८०॥

जो निवारी अधोगती । तो अधोक्षज असतां भक्तपती ।

त्यासी शरण रिघाल्या निश्चितीं । कामासक्ती निवारी ॥८१॥

राजा कामासक्तीं अतित्रासला । सबाह्य विषयीं उदास झाला ।

त्याचा वासनाकाम जो उरला । तो न वचे त्यागिला त्याचेनीं ॥८२॥

सर्वभावेंसीं संपूर्ण । हरीसि रिघालिया शरण ।

सकळ कामाचें निर्दळण । सहजें जाण स्वयें होय ॥८३॥

एकाचा मतवाद निश्चितीं । करितां श्रुतिवाक्य व्युत्पत्ती ।

यजितां इंद्रादि देवांप्रती । कामनिवृत्ति हृदयस्थ ॥८४॥

ऐसें बोलती जे सज्ञान । ते सर्वथा गा अज्ञान ।

हरीसी न रिघतां शरण । कामसंचरण शमेना ॥८५॥

इंद्रादि देव कामासक्तीं । विटंबले नेणों किती ।

त्यांचेनि भजनें कामनिवृत्ति । जे म्हणती ते अतिमूर्ख ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP