मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें| ज्ञोनोत्तर जीवन संत एकनाथांचीं भजनें अनुक्रमणिका संत एकनाथांचे चरित्र मनुष्यदेहाचे सार्थक स्वधर्माचरणाचे अगत्य निष्काम कर्म-योग मिथ्या साधनांच्या मागे लागु नका सार-ग्राही श्रवण पाहिजे अहिंसा-सत्यादी व्रते निष्ठेने पाळावी टाकावयाच्या गोष्टी : अविश्वास, अभिमान ममत्व जगात वागतांना घ्यावयाची काळजी मनोजय नादमाधुर्य नाम-माहात्म्य एकनाथांचा परिपाठ कीर्तन देवास प्रिय, कीर्तनाने सामाजिक चित्त-शुध्दि संतांची लक्षणें संतसंगतीचा एकनाथांस आलेला अनुभव परमेश्वर-स्तवन भक्ताचा संकल्प सगुण साक्षात्कार भक्तीचे स्वरूप आणि गौरव देव-भक्ताचे प्रेम (नाथांच्या मुखाने) भाव-दशा ब्रह्मनिष्ठांची लक्षणे आत्म-साक्षात्कार सर्वत्र देवदर्शन ज्ञोनोत्तर जीवन ज्ञोनोत्तर जीवन संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. Tags : bhajanekanathasantएकनाथभजनसंत ज्ञोनोत्तर जीवन Translation - भाषांतर २७७मी तो स्वयें परब्रह्म । मी चि स्वयें आत्माराममी तो असे निरूपाधी । मज नाही आधि -व्याधिमी तो एकट एकला । द्वैत-भाव मावळलामज विण नाहीं कोणी । एका शरण जनार्दनीभावार्थआत्मज्ञान झालेल्या साधकाचे मनोगत या अभंगांत संत एकनाथ व्यक्त करतात. आपणास कोणतिही आधि, व्याधी, उपाधी नाहीं. चित्तातील द्वैत भाव लयाला जाऊन परब्रह्म रुपाशी एकरूप झालो असून सद्गुरू चरणी सर्वभावे शरणागत आहे असे एका जनार्दनी म्हणतात. २७८घर सोडोनि जावें परदेशा । मज सवें देव सरिसांकडे कपाटें सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरिआतां कोणीकडें जावें । जिकडें पाहे तिकडें देवएका बैसला निरंजनी । न जाईजे जनीं वनींभावार्थघराचा त्याग करून परदेशी गेलो तरी देव सतत आपल्या समवेत आहे ही जाणीव असल्याने एकनिष्ठ भक्ताला जिकडे पाहावे तिकडे देवाचे अस्तित्व जाणवते. एका जनार्दनी म्हणतात, देव नाही असे ठिकाण च नसल्याने नगरांत किंवा अरण्यांत कोठेही न जातां एका ठिकाणी निवांत बसावे. २७९जिकडे जावें तिकडे देवचि सांगातें । ऐसे केले नाथें पंढरीच्याशब्द तेथें झाला समूळ चि वाव । गेला देहभाव हारपोनिअंतरी बाहेरीं एकमय झाले । अवघे कोंदाटलें परब्रह्मएका जनार्दनी ऐसी झाली वृत्ती । वृत्तीची निवृत्ती चिदानंदींभावार्थएका जनार्दनी म्हणतात, पंढरीच्या विठ्ठलाने अशी जादू केली कीं, जिकडे जावे तेथे देव सन्निध आहे असे वाटते. बाहेरील विश्व आणि अंतरंग विठ्ठलमय झालें. देहाचे भान हरपून गेले. सृष्टीतील अणू, रेणू या परब्रह्म स्वरुपाने व्यापून टाकले. या चे वर्णन शब्दात करावें तर शब्द च पोकळ ठरले. या चिदानंद स्वरूपांत वृत्तीची निवृत्ती झाली. २८०येणें जाणें खुंटलें क्रिया -कर्म ठेले । मज माझें भेटले आत्मरुपत्यागूं तें काय भोगूं ते काय । सर्व ब्रह्मरूप पाहे कोंदाटलेंक्रिया कर्म धर्म निखिल परब्रह्म । त्यागूं भोगूं तेथें केवळ भ्रमएका जनार्दनी सहजीसहज एक । एकी एक पाहतां कैंचेअनेकभावार्थसाधकाच्या ज्ञानोत्तर जीवनात कोठे येणे जाणें, क्रिया कर्म संपून जाते. आत्मज्ञान झाल्यानंतर कांही मिळवायचे बाकी राहत नाही. काही भोग किंवा कशाचा त्याग करण्याची ईच्छा च उरत नाही. त्याग, भोग या केवळ भ्रामक कल्पना आहेत असे वाटते. सर्व क्रिया, कर्म, धर्म एका परब्रह्मांत विलीन होतात. एका जनार्दनी म्हणतात, सर्वत्र व्यापून राहिलेल्या परब्रह्माचा एक अंश बनल्यावर दुजेपणाची वार्ता संपून जाते. २८१सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसना चि झाली स्वयेआतां चाखावें तें कायें । जिव्हा अमृता वाकुल्या दियेतया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगीं निघती जिभाएका जनार्दनी गोडी । तया क्षण एक रसना न सोडीभावार्थएका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेल्या उपदेशामृताची गोडी रसनेने चाखली आणि सर्व गोड पदार्थापेक्षा मधुर रुप रसनेनें धारण केले. रसनेलाच एव्हढी गोडी प्राप्त झाली कीं त्यापुढे अमृताची गोडी फिकी पडली. रसनेचे हे माधुर्य चाखण्यासाठी सर्वांगाला जिभा फुटल्या. गुरु- मुखांतून आलेल्या उपदेशाच्या अमृताची गोडी एक क्षणभरही सोडण्यास रसना तयार नाही. N/A References : N/A Last Updated : April 01, 2025 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP