मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नागोशीकृत सीतास्वयंवर| पदे ३०१ ते ३५० नागोशीकृत सीतास्वयंवर पदे १ ते ५० पदे ५१ ते १०० पदे १०१ ते १५० पदे २५१ ते ३०० पदे ३०१ ते ३५० पदे ३५१ ते ४०० पदे ४०१ ते ४१५ प्रस्तावना. पदे ३०१ ते ३५० ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली. Tags : nagoshisitasvayamvarनागोशीमराठीसीतास्वयंवर पदे ३०१ ते ३५० Translation - भाषांतर सर्वात तो हा वर मानलाहे । याकारणे हा वरमान लाहे ॥आणीक याची उपमा न लाहे । आनंदशेजे सुख मान लाहे ॥३०१॥जयासुखे वर्णन पूर्ण झाले । सभे विदेहे मग काय केले ॥बोलावुनी सेवक मल्ल वाडे । कोदंड तें आणविले निवार्डे॥३०२॥गळे जयांची बहुवस्त मस्ती । लावोनि ऐसे मदमस्त हस्ती ॥विदेह बोलोनि अलोभ वाचे । कोदंड ते आणविले भवाचे ॥३०३॥स्वयंवराचा पण एकमाने । आरोपिता जो गुण ये कमाने ॥स्वयंवरी हे नवरी तयाला । जो अन्यथा हे न वरी तयाला ॥कार्मुका लवकरी उचलावे । काय येथुनि उठोनि चलावे ॥माळ घेउनि करी नवरी ते । जो पराङमुख तया न वरीते ॥३०४॥स्थापिला पण असा जनकाने । आयके मग सभाजन काने ॥बोलती सभय सद्गद वाचा । लागला ज्वलन कंप दवाचा ॥३०५॥सभेपुढे पर्वत काय आला । की सर्प हा पर्वत काय झाला ॥की ही सभा शुध्द सुधा सुरा हे । याचेपुढे जीवित काय राहे ॥३०६॥धनुष्यरुपे पृथु काळदंड । हा येइजे काय महा प्रचंड ॥कोदंडरुपे वर विघ्न आले । स्वयंवरी अर्गळरुप झाले ॥३०७॥की आमुचे थोर अभाग्य हो ते । सीते वराया मग आड होते ॥की हा महामृत्यु असेल साचा । याचेपुढे सर्वहि काय वांचा ॥३०८॥सीता ह्मणे ते विजयेस पाही । रामा वराया मज आस नाही ॥अदृष्ट हे कोण असे उदले । धनुष्य सर्पाकृति आड ठेले ॥३०९॥गोष्टि फार मजशी न करा हो । प्राप्त आजि मज कार्मुक राहो ॥आठवा धनुबृहस्पति आला । वक्र केतु धनु तो मज झाला ॥३१०॥माते सये कार्मुक मंगळाने । वेडाविले फार अमंगळाने ॥किंवा असे हा शनि काय भोगी । कोदंडरुपे वर विघ्न योगी ॥३११॥कोदंड केतुग्रहनाम लाहे । पीडा करी तो ग्रहणा मला हे ॥विचित्रता साच धनुग्रहाची । नको मती सैवर आग्रहाची ॥३१२॥हा भार कैसा सकमार साहे । याहो महादेव कुमार साहे ॥पावेल माझी जननी रसा हे । कां होय कन्याजन नीरसा हे ॥३१३॥लंबोदरा पूजिन सिंदुराने । लाडू तुला वाहिन आदराने ॥विघ्नासि लांवोनि अनेक राने । धनुष्य याला उचलो कराने ॥३१४॥तूं सर्व लोका जनके तुकाई । द्वारी उदेला धनुकेतु काई ॥यावें तुवां सत्वर सैवरासी । धनुष्य होवो हळु या वरासी ॥३१५॥शंकरा नवसिते नवसाते । मेहुणे करिन मी नव साते ॥प्रार्थिते स्वजननी जगतीला । वंदिती सकळही जग तीला ॥३१६॥धांवोनि पाव मज आसरा हो । माझे वराची झणि आस राहो ॥दुर्गे मला दुर्गम फार वाटे । लावी धनुष्या हळुवार वाटे ॥३१७॥घ्यावा तुह्मी सर्वहि भार याचा । रामासि द्यावा सहसारयाचा ॥कोदंड उत्तुंग अभंग भंगो । सुरंग हा सैवररंग रंगो ॥३१८॥बर वरी जरि हा मजला भला । सुकृतराशि पहा मज लाभला ।धनुस हा चढवी तरि जीन मी । न चढवी तरि जीव त्यजीन मी ॥३१९॥कमठ पृष्ठ कठोर धनुर्महा । मदन सुंदर तो रघुराम हा ॥लघु कसा धनु लाविल पां गुणी । अहहहा ! पण दारुण, साजणी ॥३२०॥" लघुहि केसरि तो करि मारितो । लघुहि वन्हि महावन जाळितो ॥लघु अगस्तिहि नीराधे आचमी । लघुहि वामन सर्वजगाक्रमी ॥३२१॥लघुहि चित्त चमत्कृति दाखवी । लघुहि दीप तमासहि घालवी ॥लघुहि कामदुधा स्वसुखी करी । लघुहि राम तसा धनु सांवरी ॥३२२॥सोडोनि देई धडका भयाचा । सीते तुला होइल लाभ याचा ।सुवर्णमुद्रेवरि नीळजोडा । साजेल तैसा उभयांस जोडा ॥३२३॥त्यानंतरे रावण उग्रवेशी । आला धडाडा समयी सभेसी ।देखोनि त्याला सकलां जनांला । महाभये कंप विशेष जाला ॥३२४॥थरथरा नृपती किति कांपती । खटखटा मग दंतहि वाजती ॥ह्मणति पूर्वभये फूटलो उरी । सबळ हे तंव धोंडि बसे शिरी ॥३२५॥कोणी वदे सत्य ह्मणे तिजा रे । आह्मासि येते बहुसाल शारे ॥त्याची असे आजिच झाकपाळी । ह्मणोनि बांधे पटका कपाळी ॥३२६॥कोणा मनी विंशतिनत्रशंका । वस्त्रांत येते मग मूत्रशंका ॥आह्मांसि पाहा अति शैत्य झाले । याकारणे वस्त्र भिजोनि गेले ॥३२७॥" दोघी स्त्रियांच्या बहुसाळ संगे । मी फार कामी रतिरंग रंगे ॥याकारणे हे दुरुनीच पाहे । नाही तरी हे धनु काय आहे ॥३२८॥धनुष्य आधी धरितां मरावे । सीतेसि कोणे मग हो वरावे ॥पोटांत झाला बहु शूळ पाहा । धांवोनिया साधक वैद्यबाहा ॥३२९॥हा घेतलासे तरि पंचभूती । पंचाक्षरी कोण करी विभूती ॥ह्मै साभुराचा अनुभाव लक्षा । याला करावी तरि रामरक्षा ॥३३०॥" बिंदूचे परि सिंधु मानित असे पृथ्वीस बांधो पुडी ।मेरु सर्पपतुल्य भासत असे आभास घाली घडी ॥दिकचक्रे घटिकेत आक्रमितसे वायूस सुष्टी धरी ।कैलासपुरि कंदुकापरि करी देवांसि बांधी घरी ॥३३१॥पुष्पे आणित इंद्र चंद्ररविला दीपप्रचर्यां घडे ।ब्रह्मा वेद पढे जळाधिप जळे आणोनि घाली सडे ॥वारा झाडितसे स्वये पचन ते वैश्वानराला पडे ।द्वारा पाळित काळ रांडसटवी ते बंदखानी रडे ॥३३२॥विघ्ने वारितसे गणेश नगरी विष्णू समुद्रांतरी ।शेषाचा मणि मंडपासनि रुता ईशान वेत्रा धरी ॥इंद्राणीप्रमुखा करीति सदनी योषांस वेणीफणी ।हे तो कांबिट केवढे मजपुढे कैसे चढेना गुणी ॥३३३॥आकाशास महीतळी धरिन मी पृथ्वी नभोमंडळी ।मृत्यूची मुरडीन थोर नरडी घालीन पायांतळी ॥कूर्माचे कवठीस काढूनि दिवा लावीन त्या भीतरी ।तारांमौक्तिक वोढूनी मग तुरा खोवीन वेगे शिरी ॥३३४॥ब्रह्मांडासि करीन दोन शकले भेदोनिया मी नखी ।काढी दिग्गजकातडी उचटुनी लावीन त्यांचे मुखी ॥काळाचे भुजदंड ते कुडपुनी वाजे दमामा झणी ।आता कांबिट रोकडे धडफुडे मोडीन येक्या क्षणी ॥३३५॥तों लक्ष्मणाला अति कोप आला । ह्मणे पहा हा बरळो निघाला ॥वेगी प्रचंडे निज बाहुदंडे । फोडीन याची दश मुख्य तुंडे ॥३३६॥संदेह येथे मजला न वाटे । यालागिं आले भुलवीन वाटे ॥मुनी ह्मणे त्यासि उगाच राहे । होणार तें यास पुढेच आहे ॥३३७॥कोदंड पाहा मग रावणाने । जावोनि हेळे धरिले कराने ॥प्रचंड कोदंड तया न तोले । सीता सखीलागुनि काय बोले ॥३३८॥होईल माझी जननी धरा हे । ईचे मनी पूर्विल बोध राहे ॥शरासना योजिल भंगकाळा । कोदंड याला नुचलो खळाला ॥३३९॥कृपा करावी मज शंकराने । कोदंड याला नुचलो कराने ॥दाहा शिरे वीस भुजा विपारे । कोणे ग वेगे फळ भावि परि ॥३४०॥तो रावणे सज्जित देह ठेले । कोदंड झेली मग ते हटेले ॥दोर्दड चोळी निज केश सोडी । अचाट मांडीवरि ठोक फोडी ॥३४१॥मांडी खुटी येउनि तोलिताहे । तथा न तोले उर योजिताहे ॥तो कर्करा वाजति दंतदाढा । कुंथोनिया तो उभवीत मेढा ॥३४२॥उलथला पृथु मेरु जसा दिसे । उपरि तो परतोन उरी बसे ॥अवनि राक्षस पाठिसि घांसते । अधर भोंकर भोंकहि वासते ॥३४३॥गरगरा नयना फिरवीतसे । करकरा रदनासहि खातसे ॥भडभडा मुखिं रक्तहि वाहते । विफळ ते फळते तरि लाहते ॥३४४॥सुरवर बहु तूंवा दंडिले ब्रह्म अंडी । वदसि बहुत तुंडी बीरुदे लक्षखंडी ।अवचित सुरकुंडी घातली भूमिखंडी । पडसि उघडगंडी फट्ट नामर्द लंडी ॥३४५॥देव न मानित वानित आपण हा बहु बोलहि बोलत होता ।फारसफेरत कुक्करु जे परि पिंजरियांतिल सुंदर तोता ॥धोंड तयावरि आलि उरावरि या अधमा भलते तरि होका ॥३४६॥कस्त करी बहु हस्तक चोळित मस्तक डोलित हे पडलेसे ।रक्त मुखी बहु वाहत पाहत कार्मुक ते ह्र्दयी जडलेसे ॥पादत पादत कुंथत काढितसे परि तेंचि निघेना ।हस्ति जरा अति मस्तमदे तरि काय महाबळि कार्मुक घेना ॥३४७॥जे खादले सरस फार हरामसंगे ।ते आजि हे निचरते धनुषप्रसंगे ॥जो सर्व लोक पर दु:खि करीत आला ।त्याचाच हा तरि पहा परिपाक झाला ॥३४८॥ग्लांति तो करित मानवलोका । हे व्यवस्थित तुह्मी अवलोका ॥जो धनुष्य उचलील उरीचे । राज्य तो करिल हेमपुरीचे ॥३४९॥पाहतां बहुत काय तमासा । पीडितो बहु जसा घृतमासा ॥नेणतां उचलिले चपळाने । प्राण घे धनुष हेंच पळाने ॥३५०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP