वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती - कलम ११३ ते ११४

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती .

११३ . ( १ ) अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग संसदेच्या मतास टाकला जाणार नाही , पण संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात ज्यांपैकी कोणत्याही अंदाजावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी आहे , असा तिचा अर्थ लावला जाणार नाही .

( २ ) उक्त अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग अन्य खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग अनुदानार्थ मागण्यांच्या रुपाने लोकसभेला सादर केला जाईल आणि लोकसभेस कोणत्याही मागणीस अनुमती देण्याचा किंवा अनुमती नाकारण्याचा किंवा तीत विनिर्दिष्ट केलेल्या रकमेत कपात करुन त्या मागणीस अनुमती देण्याचा अधिकार असेल .

( ३ ) कोणतीही अनुदानार्थ मागणी राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही .

विनियोजन विधेयके .

११४ . ( १ ) लोकसभेने अनुच्छेद ११३ खालील अनुदाने मंजूर केल्यानंतर , होईल तितक्या लवकर ,---

( क ) लोकसभेने याप्रमाणे मंजूर केलेली अनुदाने ; आणि

( ख ) भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला , पण कोणत्याही बाबतीत , संसदेसमोर अगोदर ठेवलेल्या विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चाहून जो अधिक असणार नाही असा खर्च ,

भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पैशांचे भारताच्या एकत्रित निधीतून विनियोजन करण्याची तरतूद करण्यासाठी एक विधेयक प्रस्तुत केले जाईल .

( २ ) ज्या सुधारणेमुळे परिणामी , याप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या कोणत्याही अनुदानाची रक्कम कमीअधिक होईल किंवा त्याच्या पूर्वोद्दिष्टात फेरफार होईल किंवा भारताच्या एकत्रित निधीवर भारित केलेल्या कोणत्याही खर्चाची रक्कम कमीअधिक होईल , अशी कोणतीही सुधारणा संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात अशा कोणत्याही विधेयकाला प्रस्तावित केली जाणार नाही , आणि या खंडानुसार एखादी सुधारणा अग्राह्य आहे किंवा कसे यासंबंधात , अध्यक्षस्थानी असणार्‍या व्यक्तीचा निर्णय अंतिम असेल .

( ३ ) अनुच्छेद ११५ व ११६ यांच्या तरतुदींच्या अधीन राहून , या अनुच्छेदाच्या तरतुदींच्या अनुसार पारित झालेल्या कायद्याद्वारे विनियोजन केले असल्याखेरीज , भारताच्या एकत्रित निधीतून कोणताही पैसा काढला जाणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP