मानसपूजा - प्रकरण ४

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  ॥
लोणचीं रायतीं वळवटे । वडे पापड मेतकुटें । मिरकुटें डांगार-कुटें । मिरे घाटे सांडगे ॥१॥
नाना प्रकारच्या काचर्‍या । सांडयाकुरवडया उसर्‍या । कोशिंबिरीच्या सामोग्रया । नानाजिनसी ॥२॥
सुरण नेटके पचविले । आंबे आंवळे घातले । आलें लिंबें आणिले । घोंस मिर्‍यांचे ॥३॥
कुइर्‍या बेलें माईनमुळें । भोंकरें नेपत्ती सारफळें । कळकें कांकडी सेवकामुळें । सेंदण्या वांगी गाजरें ॥४॥
मेथी चाकवत पोकळा । माठ शेपू बसला । चंचवली चवळा वेळवेळा । चिवळ घोळी चिमकुरा ॥५॥
वांगीं शेंगा पडवळीं । दोडके कारलीं तोंडलीं । केळीं भोंपले कोहाळीं । गंगाफळें काशी-फळें ॥६॥
कणकी सोजी सांजे सपिठें । नाना डाळी धुतलीं मिठें । रवे कण्या पिठी पिठें । शुभ्रवर्णें ॥७॥
बारीक तांदूळ परिमळिक । नाना जिनसींचे अनेक । गूळ साखर राब पाक । तूप तेल मध राब ॥८॥
दूध दहीं दाट साय । ताक लोणी कोण खाय । नान शिखरिणींचे उपाय । आरंभिलें ॥९॥
हिंग जिरे भिरे सुंठी । कोथिंबीर आंवळकाठी । पिकलीं लिंबें सदेठीं । मेथ्या मोहर्‍या हळदी ॥१०॥
द्रोण पानें पत्रावळी । ताटें दुरडया वरोळी । सुपें हरि विचित्र पाळीं । नाना उपसामग्री ॥११॥
॥ इति श्रीमानस०॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP