मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|सप्टेंबर मास| सप्टेंबर २० सप्टेंबर मास सप्टेंबर १ सप्टेंबर २ सप्टेंबर ३ सप्टेंबर ४ सप्टेंबर ५ सप्टेंबर ६ सप्टेंबर ७ सप्टेंबर ८ सप्टेंबर ९ सप्टेंबर १० सप्टेंबर ११ सप्टेंबर १२ सप्टेंबर १३ सप्टेंबर १४ सप्टेंबर १५ सप्टेंबर १६ सप्टेंबर १७ सप्टेंबर १८ सप्टेंबर १९ सप्टेंबर २० सप्टेंबर २१ सप्टेंबर २२ सप्टेंबर २३ सप्टेंबर २४ सप्टेंबर २५ सप्टेंबर २६ सप्टेंबर २७ सप्टेंबर २८ सप्टेंबर २९ सप्टेंबर ३० नामस्मरण - सप्टेंबर २० महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल . Tags : brahmachaitnya maharajgondavaleparamarthaगोंदवलेपरमार्थब्रह्मचैतन्य महाराज प्रपंचाची आठवण । हेंच दुःखाचें कारण ॥ Translation - भाषांतर आपण रामापाशीं मागावें एक । ‘ तुझे इच्छेनें सर्व जगत चालतें देख । त्यांतील मी एक पामर । रामा , तुला कसा झालों जड ? ॥ रामा , अन्यायाच्या कोटी । तूंच माय घालीं पोटीं ॥ मातेलागीं आलें शरण । त्याला नाही दिलें मरण । ऐसें ऐकिलें आजवर । कृपा करीं तूं रघुवीर ॥ दाता राम हें जाणून चित्तीं । म्हणून आलों दाराप्रति ॥ आता रामा नको पाहूं अंत । तुजवीण शून्य वाटे जगत ॥ ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ । तें तें झालें दुःखाला कारण ॥ आतां असो नसो भाव । मी रामा ! तुझा झालों देख ॥ आतां कसें तरी करीं । मी पडलों तुझ्या दारीं ॥ आता लौकिकाची चाड । नाहीं मला त्याची आवड । हें ठसावे चित्ती । कृपा करीं रघुपति ॥ आता मनास येई तसें करीं । माझें मीपण हिरोनि जाई ॥ ’ जोंवर देहाची संगति । तोंवर मी -माझें ही वृत्ति । राहील अभिमानाला धरुन । तेथे न राहे कधीं अनुसंधान ॥ काळोख अत्यंत मातला । घालवायला उपाय न दुजा सुचला ॥ होता सूर्याचें आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥ प्रपंचांतील संकटें अनिवार । माझ्या बोलण्याचा करावा विचार । आतां कष्टी न व्हावें फार ॥ प्रपंचाची आठवण । हेंच दुःखाचें मूळ कारण ॥ तेंच घोकीत बसल्यानें । न होई आनंदरुप स्मरण ॥ सुखदुःखाची उत्पत्ति । आपलेपणांत आहे निश्चित ॥ स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझे मीच दुःखाला कारण ॥ आपण आपलेपणानें वागत गेलें । सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागलें ॥ अमुक व्हावें , अमुक होऊं नयें , । याचें कसे होईल , त्याचें कसे होईल , । ही चित्ताची अस्वस्थता । याचें नांव चिंता ॥ सुखदुःखें चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥ सुखदुःख परिस्थितीवर नसतें । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहतें ॥ ज्यांत एकाला सुख वाटते । तेच दुसर्याला दुःखाला कारण होतें ॥ दुःखाचें मूळ कारण । जगत सत्य मानलें आपण ॥ देहानें कष्ट केले फार । त्यांतील फळाचा घेऊन आधार ॥ फळ नाहीं हातीं आलें । दुःखाला कारण तें झालें ॥ आपले चित्त झालें विषयाधीन । नाहीं दुःखास दुसरें कारण ॥ मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचें चिंतन । हेंच दुःखाला खरें कारण ॥ याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥ प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥ वृत्ति होऊ द्यावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥ N/A References : N/A Last Updated : October 12, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP