मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड|

स्वर अंतरंगाचे - लोकशाही

काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड


लोकशाहीचे निशाण फडकत ठेऊ विश्वात ॥ध्रृ॥

स्वातंत्र्याच्या नंदनवनात
लोकशाहीची फुले फुलली
तो प्रेमळ मध सेवनात
गुणी पाखरे गढुनी गेली
अशा या नंदनवनात एकात्मता मानांकित ॥१॥

परकीयाने विस्कटलेली
अज्ञानाने दुरावलेली
भारतीय समाजाची घडी
लोकशाहीने एकत्र केली
प्रजासत्ताकाचा दीप तेवत ठेऊ या देशात ॥२॥

मानवता पार झाली होती
कर्तव्य सोडूनी दिशाहीन
प्रेम तर बसलें होते येथे
दोन मनात भिंत बनून
आपला बंधुभाव वाढी लागला लोकशाहीत ॥३॥

ज्या मातीतून सत्यधर्म
उदया येऊनी नभी गेला
ज्या पवित्र संस्कृतितून
सतशीलाने सुगंध दिला
या आदर्श संस्कृतिचा संगम झाला घटनेत ॥४॥

अविकसित देश आपुला
आता विकास पाहू लागला
शेतकरी देन दलिताना
न्याय, सन्मान मिळू लागला
तिरंगी झेंडयाखालची एकची भारतीय जात ॥५॥

भिऊ नकोस भविष्याला
येणार नाही पेशवाई
घटनेची कवच कुंडले
तोवर जिवंत लोकशाही
एकात्मतेच्या हातावरी धरु मानवतेचा छत ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP