मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|अध्यात्मपर पदे| भाग ६ अध्यात्मपर पदे भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ अध्यात्मपर पदे - भाग ६ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग ६ Translation - भाषांतर १६०१( राग-कल्याण; ताल-दीपचंदी; चाल-अरे नर० )अरे मन पावन देव घरीं । अनहित न करीं ॥ध्रु०॥नित्यानित्य विवेक करावा । बहु जन उद्धरीं ॥१॥आत्मा कोण अनात्मा कैसा । पर पार उतरीं ॥२॥दास म्हणे तुझा तूंचि सखा रे । हित तुझें तूं करीं ॥३॥१६०२( राग-केदार; ताल-त्निताल; चाल-कोण मी मज० )मन गे निश्चळीं चंचळ जालें । संकल्पेंचि विराट वाढलें ॥ध्रु०॥निश्चळ गगनीं आमाळ आलें । आलें सवेंचि उडालें ॥१॥निद्रिस्तानें स्वप्र देखिलें । जागें होतां माइक जालें ॥२॥बाजीगरी वोडंबरी । दास म्हणे तैसी परी ॥३॥१६०३( राग-रामकली; ताल-धुमाळी. )मज मीपणाचे नाहीं । सुख दुःख कैचें काईं । शुद्ध स्वरूपचि पाहीं । सदोदित ॥ध्रु०॥मीपण नव जातां माझें । वंदितां हि दुःख वोझें । मीपण गेलिया सहजें । नेदितां सुखें ॥१॥देहसंगें दिसे । परि दग्ध जालें असे । जैसें बीज अग्निलेशें । नसोनि असे ॥२॥रामीरामदासीं देहीं । देहुबुद्धि ते हि नाहीं । विदेह बुद्धि पाहीं । उरली नसे ॥३॥१६०४ ( राग-केदार; ताल-त्निताला. )कोण मी मज कळतचि नाहीं ॥ सारासार विचारूनि पाहीं ॥ध्रु०॥नर म्हणों तरि नारिचि भासे ॥ नारि म्हणों तरि समूळ विनासे ॥१॥दास म्हणों तरि राम चि आहे ॥ राम म्हणों तरि नाम न साहे ॥२॥१६०५(राग-देसकार; ताल-धुमाळी. )जाण बापा जाण बापा जाण बापा अनुभव सोपा ॥ध्रु०॥डोळ्यांत भरलें देखणियां चोरलें । वायूंत थारलें उडेचिना ॥१॥नमाचिसारिखें नम नव्हे पारिखें । इंद्रियें हरिखें वेडावलीं ॥२॥जाणण्यांत आगळें जाणीवे वेगळें । स्वरूप सगळें रामदासीं ॥३॥१६०६( राग-केदार; ताल-त्निताल; चाल-कोण मी० )धन्य जगदीश एकला । व्याप उदंडचि करित गेला ॥ध्रु०॥अंडज जातीं जिनस किती । रंगरूप किती एक गुणाला ॥१॥जारज काया कोण गणाया । मेद अनेक्चि नाहीं मंगला ॥२॥स्वेदज जळचर कोण जाणे पार । जेथें तेथें सावधचि जाला ॥३॥उद्भिज लेखा उदंड चि देखा । दासा म्हणे पुरोनि उरला ॥४॥१६०७( राग, ताल व चाल-वरील. )एकला जगदांतरा जाला। कोणिच नाहीं तयाला ॥ध्रु०॥चारी खाणी चारी वाणी । हालवि बोलवि चालवी त्याला ॥१॥एक घरी एक त्यागित आहे । आपणा आपण भोगित आहे ॥२॥दास म्हणे बहुविंध तमासा । पाहेल तो मग होईल तैसा ॥३॥१६०८( राग, ताल व चाल-वरील )निर्गुण रूपीं मिळाला । जन पावन जाला ॥ध्रु०॥बहुत वेळे आला गेला । सज्जनसंगें निवाला ॥१॥आत्मशास्त्रगुरुप्रत्यय पाहातां । अंतरीं निश्चय आला ॥२॥दास म्हणे मन आत्मनिवेदनें । उन्मनीं बोधें बुडाला ॥३॥१६०९( राग-शंकराभरण; ताल-धुमाळी)काय पाहों मी आतां । रूप न दिसे पाहतां । खूप न ये सांगतां रे रामा ॥ध्रु०॥द्दश्य पाह्तां डोळां । वाटतो सोह्ळा । त्याहूनि तूं निराळा रे रामा ॥१॥ज्ञान हातासी आलें । त्याचें विज्ञान जालें । तेंहि नाहीं राहिलें रे रामा ॥२॥देह लटिका जाला । अनुमव कोणा आला । भेटी देईं मजला रे रामा ॥३॥तुज पाहों जावें । आपणां मुकावें । तेथें काय पहावें रे रामा ॥४॥दासें घेतली आळी । पावावें ये काळीं । सगुणरूपें सांमाळीं रे रामा ॥५॥१६१० ( राग-असावरी; ताल-दीपचंदी. ) प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट न्रिरंजन आहे । आगम निगम संतसमागम सद्गुरुवचनें पाहें ॥ध्रु०॥आत्माविचारें शास्त्रविचारें गुरुविचारें बोध । मीपण तूंपण शोधून पाहतां आपण शोध ॥१॥जडासी चंचळ चालविताहे चंचळ स्थिर न राहे । प्रचित आहे शोधूनि पाहे निश्चळ होऊन राहे ॥२॥भजनीं भजन आत्मनिवेदन श्रवण मनन साधा । दास म्हणे निजगुज साधतां होत नसे भवबाधा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP