मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
म्लेंछ प्रायश्चित्त

धर्मसिंधु - म्लेंछ प्रायश्चित्त

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


जो मनुष्य कांही काल म्लेंछ झालेला असून प्रायश्चित्तास योग्य असेल त्याचे १६ कृच्छ्र इत्यादि प्रायश्चित्त पुत्रानें करुन पलाशविधीनें दहनादिक करावें. प्रमादमरणावांचून चौर्य, परस्त्रीगमन, इत्यादि कारणांवरुन आलेल्या दुर्मरणाविषयीं २ चांद्रायणें किंवा तप्त कृच्छ्र अशीं मोठ्या ग्रंथांतून पाहून योजावी. व्याघ्रादिकांपासून प्राप्त झालेल्या दुर्मरणाविषयीं शातातपानें सांगितलेला दानादिक विधीही करावा. तो असाः- व्याघ्रानें मारल्यास ब्राह्मणकन्येचा विवाह करावा. हत्तीनें मारला गेल्यास ४ निष्क सुवर्णाचा हत्ती करुन त्याचें दान करावें. राजानें मारल्यास सुवर्ण पुरुष करुन त्याचें दान करावें. चोरानें मारल्यास प्रत्यक्ष धन दान करावें. शत्रूनें मारल्यास वृषभ दान; वृषभानें मारल्यास यथाशक्ति सुवर्णदान; शय्येवर मृत झाल्यास निष्क सुवर्णाची विष्णुमूर्ति करुन ती शय्येवर ठेवून गादीसहित शय्या दान करावी. अशौचावस्थेंत मरण आल्यास २ निष्क सुवर्णाचे विष्णुमूर्तीचें दान करावें. संस्कारहीन मरण आल्यास ब्राह्मणाचे पुत्राची मुंज करावी. अश्वानें मारल्यास ३ निष्क सुवर्णाचा अश्व करुन त्याचें दान करावें. कुत्र्यानें मारल्यास क्षेत्रपालाची स्थापना करावी. डुकरानें मारल्यास महिषाचें दान करावें. कीटकांनीं मारल्यास ५ खारी परिमित गव्हाचें दान करावें. वृक्षानें मरण पावल्यास वस्त्रसहित सुवर्णवृक्षाचें दान करावें; शृंगयुक्त पशूनें मारल्यास वस्त्रयुक्त वृषभाचें दान करावें; गाडीनें मरण पावल्यास उपस्करयुक्त किंचित् द्रव्याचें दान करावें. कड्यावरुन पडून मेल्यास धान्यपर्वताचें दान करावें. अग्नीतें मरण पावल्यास विहिर, तलाव इत्यादिकांचा उत्सर्गविधि करावा. काष्ठानें मरण पावल्यास धर्मशाळा बांधावी. शस्त्रानें मेल्यास महिषीदान करावें. पाषाणानें मृत झाल्यास सवत्स दुभत्या गाईचें दान करावें. विषानें मरण पावल्यास सुवर्णाची पृथ्वी करुन तिचें दान करावें. गळफांसानें मेल्यास सुवर्णमय वानराचें दान करावें. जलांत मरण पावल्यास दोन निष्क सुवर्णाची वरुणमूर्ती करुन तिचें दान करावें. मोडशीनें मेल्यास मधुसत्रानें १०० ब्राह्मणांस भोजन घालावें. घशांत घास अडकून मेल्यास घृतधेनूचें दान करावें. खोकल्यानें मेल्यास ८ कृच्छ्रें करावी. अतिसारानें मेल्यास लक्षगायत्रीजप करावा. शाकिनी इत्यादि ग्रहांच्या पीडेनें मेल्यास रुद्रैकादशनीचा जप करावा. वीज पडून मेल्यास विद्या दान करावें. अंतरिक्ष मृत असतां वेदाचें पारायण करावें. पतित होऊन मरण पावल्यास १६ कृच्छ्रें करावी. अस्पृश्यास स्पर्श करुन मरण पावल्यास सच्छास्त्राचे पुस्तकाचें दान इत्यादि करावें.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP