मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यदाऽऽत्मन्यर्पितं चित्तं शान्तं सत्त्वोपबृंहितम् ।

धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चभिपद्यते ॥२५॥

आपुलें जें कां अंतःकरण । तें करितां गा मदर्पण ।

माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥२५॥

मद्‌रूपीं अर्पावया मन । सुगम वर्म सांगेन जाण ।

माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥२६॥

सकाम स्मरतां नाम । नाम पुरवी सकळ काम ।

निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥२७॥

होतां पापाचें क्षालण । रज तम जिणोनि जाण ।

सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥२८॥

स्वधर्मनिष्ठ सत्त्वगुणें । अढळ पडे वैराग्याचें ठाणें ।

वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥२९॥

वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचें अनुसंधान ।

चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥३३०॥

मन जाहल्या मदर्पण । निजभक्ति उल्हासे जाण ।

जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥३१॥

निजभक्ति पावल्या संपूर्ण । भक्तें न मागतां जाण ।

अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥३२॥

जो सिद्धींकडे कदा न पाहे । त्यासी अवशेष कोण अर्थ राहे ।

माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्‍भक्तां ॥३३॥

ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लाभतां आत्मस्थिती ।

वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP