मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
जनांस उपदेश ४६

उपदेश - जनांस उपदेश ४६

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४६.
ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतीचें वचन । सर्व नारायण सर्वां-भूतीम ॥१॥
चहूम शिक्षा जनीं गुरु चालू वर्ण । प्रत्यक्ष पुराणें साक्ष देती ॥२॥
हेळसुनी निंदी दुरावी ब्राह्मणा । सभेमाजी जाणा दुर्‍हा­-विती ॥३॥
त्याचें पाप नाहीं खंडण सर्वथा । म्हणोनि अनंता भय वाटे ॥४॥
कोपला प्रहर ब्राह्मणा मारिला । लक्ष वेडावलीं भूषण-त्या ॥५॥
क्रोध अग्नि ज्वाळा झगटती जेथें । न उरती तेथें काडि-मात्रें ॥६॥
उगेंच ब्राह्मणा सांबें छळियेलें । सर्व शांत झाले आपो-आप ॥७॥
अपेक्षिती कोण्ही तेंचि तें होतें । न बोलावे येथें बोल कांहीं ॥८॥
अग्नीसी लहान थोर न ह्मणावा । पडे परिस्वाहा सर्व कांहीं ॥९॥
मार्कंडेय बुद्धि छळूनि ब्राह्मन । आयुश्य तें उणें होय माझें ॥१०॥
ब्राह्मणाचें वीर्य मातंगीचे पोटीं । त्याचि एका गोष्टी आशिर्वाद ॥११॥
आयुष्याचे कल्प सात चौदा होती । ऐ-कोनि विश्रांति कीर्तनानें ॥१२॥
धन्य गोत वित्त स्त्रिया आणि पुत्र । सर्व व्हावें हित ब्राह्मणातें ॥१३॥
कुळक्षयो व्हावे ऐसें वाटे जीवा । ब्राह्मणासीं दावा नको बापा ॥१४॥
नामा म्हणे ऐके धन्य ते ब्राह्मण । धरिले चरण माथां त्यांचे ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP