मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
तगतो धणी माझा धणी माझा । ...

श्री कल्याण स्तवन - तगतो धणी माझा धणी माझा । ...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

तगतो धणी माझा धणी माझा । कल्यान सद्‍गुरुराजा ॥ध्रु०॥
श्रमहरणीतिरीं साजे । ज्याची समाधी हो विराजे ॥१॥
ब्रह्मचर्य व्रतधारी । जो कां नि:संग निर्विकारी ॥२॥
निस्पृह महंत विरागी । जो कां संगातीत नि:संगी ॥३॥
रामउपासक ज्ञानी । ज्याचे शतपथ तो गुण वानी ॥४॥
शाम म्हणे मी ज्याचा । चाकर आज्ञाधारक साचा ॥५॥

आलों शरण तुजलागी जिवेंभावें । भवार्णवापासोन सोडवावे ॥१॥
कृपा कीजे कल्याण गुरुराया । वेळोवेळा लागेन तुझ्या पाया ॥ध्रु०॥
करूं नेणे सद्भक्ती तुझी सेवा । परी म्हणवीतो दास गुरुदेवा ॥२॥
शामा म्हणे अपराध माझे कोटी । दयाघना तूं घाली सर्व पोटीं ॥३॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP