सद्गुरु समर्थ भेटले मन केलें धीट । दाविली मोक्षपदी वाट ॥धृ०
कायापुरी बाजार शहरांत भरला घनदाट । मोठी उदम्यांची पेठ ॥
चौसष्ट बहात्तर गल्ल्यांमध्ये व्यापार अचाट । बावन्न गडयांचा रस्ता नीट ॥
सहा, चार अठरा बारा, सोळा करिती नित थाट । किराणा घेऊन बसले चट ॥
दहा सहांनी कळ माजविली केला अवघा वीट । बाजंदि नारी फिरे आठ ॥१॥
शरहामध्यें चार खरे लुच्चे फिरे सहाजन । भुलविले जन कपट गमन ॥
अवघा खर्च लिहिला कारकून चित्रगुप्त दोन । नित्य रोजीं करिती टिपण ॥
शहर पाहुनि शांत झाले गेले वरति चढून । त्रिवेणीचे केले मन स्नान ॥
त्रिवेणीच्या वर जाता झाली उन्मनीची भेट । ओंकार बीज तेथे उमट ॥२॥
महाबीजशून्यावर परब्रह्म दिसलें दसव्या द्वारी । पाहातां सुख वाटे अंतरी ।
असे मशी वाटले बाई मी आलें कैलासपुरी । सुख वाटे अंतरी ।
असे मशी वाटले बाई मी आले कैलासपुरी । सुख दु:ख विसरले सारें ।
शांति दया क्षमा बहीण भेटली भक्ति खरी । सोहं नाम मंत्र उच्चारी ॥
अशा पुरुषांचा संग करावा पाय धरी बळकट । तेथेच होईल शेवट ॥३॥
भाव विवेक वैराग्य साधलें निजबोध गडनी । अशी जोडी नाहीं त्रिभुवनी ॥
देहाची मी विदेह झाले गेले रुपांत मिळूनी । चुकविल्या चौर्‍यांशी योनी ॥
दत्त सावतळ प्रसन्न गुरु भीमराज मले गुणी । बोलले गणपत आत्मज्ञानी ।
जुना गांव ओळखूनशेनी शोधा कैलास पेठ । पाजिला गुरुनी प्रेम घोट ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP