मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ३

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अविरोधितया कर्म नाविद्यां विनिवर्तयेत् ।
विद्याविद्यां निहंत्येव तेजस्तिमिरसंघंवंतं ॥३॥

टीका :- नवज्वर येतां रोगिया अंगिं । दुग्ध पाजिली तयालागि । रोग न जातां लागवेगिं । मृत्युगृहासि जाय तो ॥५३॥
किं कामिलागि कामशास्त्र । किं भ्रमिलियालागि मोइनास्त्र । तैसें अज्ञाननाशनि कर्मशास्त्र । उपेगा लागि नयेचि ॥५४॥
अग्नि लागला गृहासि । वरति प्रोक्षणें तैलासि । कर्में करुनिया आज्ञानसि  नाश तैसा नोव्हेचि ॥५५॥
कर्म सानकूळ अज्ञानासि । म्हणोनि अज्ञान न नासे तयासि । येथें पाहिजे विनाशासि । विरोधि भाव निश्चित ॥५६॥
जैसें ज्वरितासि कटु वोषध । किं भ्रमिष्टालागि पंचाक्षरि प्रसिद्ध । कीं कामिकालागि वैराग्य विषद । निश्चयेंसी पाहिजे ॥५७॥
जळ पाहिजे अग्निनाशासि । किं प्रकाश पाहिजे तमनिरासि । तैसें समूळ अज्ञान नासावयासि । विद्याचि येथें पाहिजे ॥५८॥
तंव सिष्य म्हणे वो स्वामिकृपाळा । प्रतिशरीरिं आत्मा वेगळा । अवच्छिन्न दिसे माझिया डोळा । त्यासी मुक्ति कैसि संभवे ॥५९॥
येके देहिं आत्मा मुक्ता आणि येके देहिं बद्ध निश्चित । हे मज वाटे संशययुक्त । महाराजा श्रीगुरु ॥६०॥
मी सर्वस्वें शरणागत । दास स्वामींचा अंकित । कृपा करोनि माझें चित्त । संशयरहित करावें ॥६१॥
मग श्रीगुरु होउनिया प्रसन्न । करोनि सिष्यातें सु - ईक्षण । म्हणति होवोनि सावधान । वचन आतां परियेसि ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP