एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अहोरात्रैश्छिद्यमानं, बुद्धावायुर्भयवपेथुः ।

मुक्तसङगः परं बुद्धवां, निरीह उपशाम्यति ॥१६॥

अहोरात्र आयुष्यभंग । कळिकाळाचा सवेग वेग ।

हां जाण नीच नवा रोग । अंगीं साङग लागला ॥५९॥

काळें काळ वयसा खातु । हा देखोनि आयुष्याचा घातु ।

जाणोनि नरदेहाचा पातु । होय अनासक्तु देहगेहां ॥१६०॥

जाणोनि देहाचें क्षणिकपण । त्यागावया देहाभिमान ।

साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ॥६१॥

न सांडितां देहाभिमान । अंगीं आदळे मरण ।

तेणें भयें कंपायमान । वैराग्य पूर्ण स्वयें धरी ॥६२॥

वैराग्ययुक्त करितां भक्ती । होय देहाभिमानाची निवृत्ती ।

तैं घर रिघे ज्ञानसंपत्ती । पायां लागती मुक्ती चारी ॥६३॥

ऐशी झालिया निजात्मप्राप्ती । सहजेंचि राहे प्रवृत्ती ।

निवृत्तीसी होय निवृत्ती । संसाराची शांती स्वयें होय ॥६४॥

ऐसे नरदेहा येऊनि देख । पुरुष पावले ’परमसुख’ ।

हें न साधिती जे मूर्ख । त्यांसी देवो देख निंदित ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP