मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
जागृतस्थितीतील अरिष्टे

धर्मसिंधु - जागृतस्थितीतील अरिष्टे

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आरंभी ध्रुव, आकाशगंगा, स्वतःच्या नासाचा अग्रभाग व चंद्रावरील डाग ज्याचे आयुष्य हीन झाले असेल त्यास दिसत नाही; ज्याची पावले धूळ, चिखल इत्यादिकांत तुटकी दिसतील किंवा स्नान केले असता सर्व अवयव ओले असताही ज्याचे मुख मात्र अगोदर शुष्क होते, सूर्यादिक दोन दिसतात, सर्व वृक्ष सुवर्णासारखे दिसू लागतात; आपली पावले चिखलात दिसत नाहीत; दोन्ही बोटे कानात घातली असता आत होणारा आवाज ऐकु येत नाही; जलादिकात आपले प्रतिबंब पहाताना शीर दिसत नाही, आपल्या छायेत छिद्रे दिसू लागतात, इत्यादि लक्षणे दिसू लागली तर तो पुरुष फार दिवस जगणार नाही.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP