मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
उत्पादकांची शांति

धर्मसिंधु - उत्पादकांची शांति

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


नानाप्रकारचे दिव्य, भौम व अंतरिक्ष उत्पात झाले असता संकल्पादिक करून कलशावर इंद्र व रुद्र यांची पूजा करावी. नंतर 'यतइंद्र०, स्वस्तिदाविशस्वतिः०, अघोरेभ्योथ०" या मंत्रांनी समिधा, आज्य, चरु, व्रीहि व तिळ या प्रत्येक द्रव्याचा १००८ होम करावा. व्याह्रतिमंत्रांनी तिलांचा कोटिहोम, लक्षहोम, आयुतहोम अथवा त्याचा चतुर्थांश म्हणजे २५०० होम द्रव्यशक्ति असेल त्याप्रमाणे व लहानमोठे निमित्त असेल त्याप्रमाणे सप्तरात्र, त्रिरात्र किंवा एकरात्र करून सूर्य, गणेश, क्षेत्रपाल व दुर्गा यांच्या मंत्राचा जप करून पायसादिकाने ब्राह्मण भोजन घालावे अथवा चंडी सप्तशतीचा जप करावा; किंवा रुद्राचा जप, अथवा अभिषेक करावा; अथवा अश्वत्थाला प्रदक्षिणा, शिवपूजा, गाईब्राह्मणांची पूजा इत्यादिक गोष्टी कराव्या. याप्रमाणे नानाप्रकारच्या उत्पातांच्या शांति सामान्यतः सांगितल्या.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP