मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
प्रयाणी नियम

धर्मसिंधु - प्रयाणी नियम

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


प्रयाणकाळी क्रोध, श्मश्रूकर्म, वाति, तैलाभ्यंग, अश्रुपात, मद्य, मांस, गुड, तैल, श्वेततिलकाशिवाय इतर तिलक व श्वेतभिन्न वस्त्र हे वर्जावेत. प्रयाण दिवसापूर्वी श्मश्रू कर्म पांच दिवस, दूध तीन दिवस, मैथुन ७ रात्री व मध, तेल आणि घृत ही प्रयाण दिवशी वर्ज करावीत. संभोगदानापर्यंत स्त्रियेचे रजस्वलात्व व इतर दुष्ट शकुन प्रयाणास वर्ज करावेत. सुमुहूर्तावर स्वतः जाणे अशक्य असेल तर प्रस्थान करावे. इष्ट वस्तु दुसर्‍या स्थली नेऊन ठेवणे यास प्रस्थान असे म्हणतात. ब्राह्मणाने यज्ञोपवीत, क्षत्रियाने आयुध, वैश्याने मध व शूद्राने फल ही गमनमुहूर्ती दुसर्‍याच्या घरी नेऊन ठेवावीत. सुवर्ण, धान्य, वस्त्र इत्यादि सर्वांनी ठेवावीत. प्रस्थान केल्यावर राजाने दहा दिवस व इतरांनी पाच दिवस घरी रहावे यापेक्षा अधिक दिवस राहू नये. स्वतः प्रयाण करण्याऐवजी यज्ञोपवीतादि वस्तु बाहेर नेऊन ठेविला असता म्हणजे प्रस्थान केले असता शुभकाली प्रयाण केले असता मिळणार्‍या फलाचे अर्धे फल मिळते.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP