मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
अंतःपटधारण

धर्मसिंधु - अंतःपटधारण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


अंतःपटधारणापासून कन्यादानापर्यंत कृत्य कोणी अग्निस्थापनानंतर करतात, कोणी पूर्वांग होम झाल्यानंतर करतात, कोणी आज्यसंस्कारानंतर करतात, याप्रमाणे अनेक पक्ष आहेत. त्याविषयी आपापल्या गृह्यसूत्राप्रमाणे व जसा आचार असेल त्याप्रमाणे व्यवस्था जाणावी. त्यानंतर वधूवरांना अभिषेक करावा. नंतर त्यांनी परस्परांच्या हातात कंकणे बांधावी. नंतर अक्षतारोपण, परस्परांनी परस्परांना तिलक लावणे, माळा घालणे, अष्टपुत्री, कंचुकी, मंगळसुत्र, इत्यादि वराने वधूला देणे, गणपतीची पूजा करणे, लाडू बांधणे, अंगावरील वस्त्राचे टोकास गाठ देणे, लक्ष्मी आदि देवतांचे पूजन करणे, इत्यादि ऋग्वेदी यांच्या कन्यादानाचा अनुक्रम आहे. इतर शास्त्रीयांचा त्यांच्या त्यांच्या गृह्यसूत्राप्रमाणे जाणावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP