मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
विवाहामध्ये दर्श

धर्मसिंधु - विवाहामध्ये दर्श

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


मौजी, विवाह यांचे नांदीश्राद्धाला आरंभ करून मंडपोद्वासन होईपर्यंत मध्ये दर्श दिवस येणार नाही असे करावे. दर्श खेरीज करून मातापितरांचा क्षय दिवस इत्यादि श्राद्ध दिवस जर जाणून अथवा न जाणून मध्ये येत असेल तर त्रिपुरुश सपिंडांनी विवाहादि मंगल कार्य समाप्त करून नंतर श्राद्ध करावे. याप्रमाणे दर्शावाचून इतर श्राद्धाचाच विवाहामध्ये स्वरूपतः निषेध सांगितला. दर्शाचे निषेधाप्रमाणे श्राद्धरहित अशा श्राद्धतिथिमात्राचा निषेध सांगितला नाही. कारण "विवाह झाल्यानंतर मागाहून श्राद्ध करावे." असे वचन आहे. यावरून संक्रांति, मन्वादि, अष्टकादि इत्यादि हे श्राद्धदिवस असल्यामुळे मध्ये येण्याचा निषेध आहे की काय अशा शंकेचे निरसन झाले. अर्थात षण्णनवति श्राद्ध करणार्‍या सपिंडांनी मन्वादि दिवस विवाहामध्ये येईल तर प्रायश्चित्त इत्यादिकाने त्याची सिद्धि करावी. याप्रमाणे विवाहाचे चार दिवसांत दर्श इत्यादि आल्यास त्यासंबंधी निर्णय सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP