मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
गणांचा विचार

धर्मसिंधु - गणांचा विचार

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, भरणी, रोहिणी व आर्द्रा ही नक्षत्रे असता मनुष्यगण; हस्त, रेवती, पुनर्वसु, पुष्य, स्वाती, मृग, श्रवण, अश्विनी व अनुराधा ही नक्षत्रे असता देवगण; कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा शततारका ही नक्षत्रे असता राक्षसगण; याप्रमाणे जन्मनक्षत्रांचे गण जाणावे. वधुवरांचा एकच गण असेल तर शुभ होय. देवगण व मनुष्यगण असेल तर मध्यम होय. देवगण व राक्षसगण असेल तर वैर होय. राक्षसगण व मनुष्यगण असेल तर मरण होय. याकरिता मनुष्यगण व राक्षसगण यांचा विवाह करू नये. यांचे गुण- दोघांचाही एक गण असेल तर सहा गुण; वराचा देवगण व वधूचा मनुष्यगण यांचे देखील सहा गुण; वराचा मनुष्यगण आणि वधूचा देवगण असेल तर पांच गुण. वराचा राक्षसगण व वधूचा देवगण असेल तर एक गुण. वराचा देवगण आणि वधूचा राक्षसगण असेल तर शून्य गुण. एकाचा मनुष्यगण व दुसर्‍याचा राक्षसगुण यांचाही शून्य समजावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP