मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
भीष्माष्टमी

धर्मसिंधु - भीष्माष्टमी

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयांत नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


माघ शुद्ध अष्टमी ही भीष्माष्टमी होय. या तिथीवर जे कोणी श्राद्ध करतात, त्यांना संतति होते. या तिथीवरचे श्राद्ध काम्य असून तर्पण अवश्य आहे. तर्पण केल्याने एक वर्षाच्या पापाचा नाश होतो व न केल्याने पुण्यनाश होतो असे सांगितले आहे. या तिथीवर करण्याच्या तर्पणाचा मंत्र -

'वैयाघ्रपद्यगोत्राय सांकृत्य प्रवरायच गंगापुत्राय भीष्माय आजन्मब्रह्मचारिणे ॥

अपुत्राय जलं दद्मि नमो भीष्माय वर्मणे ।

भीष्मः शान्तनवो वीरः सत्यवादी जितेंद्रियः ॥

अभिरद्भिरवाप्नोतु पुत्रपौत्रोत्रोचितां क्रियाम् ॥

असे अपसव्याने तर्पण केल्यावर आचमन करून, सव्यानेजे अर्घ्य द्यावे त्याचा मंत्र-

वसूनामवताराय शान्तनोरात्मजाय च ।

अर्घ्यं ददामि भीष्माय आबाल्यब्रह्मचारिणे ॥

ज्याचा बाप जिवंत असेल त्याला तर्पणाचा अधिकार नाही असे कौस्तुभात जरी सांगितले आहे, तरी तसा अधिकार असल्याचे बरेच ग्रंथकार सांगतात. या कामाकरिता मध्याह्नव्यापिनी अष्टमी घ्यावी; कारण, श्राद्ध वगैरे एकोद्दिष्ट करावीत असे शास्त्र आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP