पावनखिंडीत

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


सरणार कधी रण प्रभू तरी

हे कुठवर साहू घाव शिरी ?

दिसू लागले अभ्र सभोती

विदीर्ण झाली जरि ही छाती

अजून जळते आंतर ज्योती

कसा सावरू देह परी ?

सरणार कधी रण प्रभू तरी !

हो तनूची केवळ चाळण

प्राण उडाया बघती त्यातुन

मिटण्या झाले अधीर लोचन

खड्‌ग गळाले भूमिवरी

सरणार कधी रण प्रभू तरी !

पावन-खिंडित पाउल रोवुन

शरीर पिंजे तो केले रण

शरणागतिचा अखेर ये क्षण

बोलवशिल का अता घरी ?

सरणार कधी रण प्रभू तरी !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३२


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP