पंचीकरणादी अभंग - २१ ते २५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२१
अनावृष्टि धरा शत संवत्सर । तेणें जीवमात्र संहारती ॥१॥
संहारती कोणी नसे भूमंडळीं । सूर्य बारा कळीं तपईल ॥२॥
तपईल तेणें जळेल धरणी । काद्रवेयाची फणी पोळईल ॥३॥
पोळईल तेणें विषांचें हळाळ । मार्तंडाचे ज्वाळ एक होती ॥४॥
होती गिरिशृंगें सर्व भस्मरूप । तयालागीं आप बुडवील ॥५॥
बुडवील धरा जळचि निखळ । तयासि अनिळ शोषूं पाही ॥६॥
विझविता होय वायू त्या वन्हीसी । विश्रांती वायूसि नभापोटीं ॥८॥
नभापोटीं चारी भूतें मावळलीं । नभाकार जाली वृत्ति तेव्हां ॥९॥
वृत्ति नभें ऐसा नटला अन्वय । पांचवा प्रळय दास म्हणे ॥१०॥

२२
म्हणे हें जाणावें आकाशासारिखें । मायाही ओळखे वायू ऐसी ॥१॥
वायूऐसी माया चंचल चपळ । ब्रह्म तें निश्चळ निराकार ॥२॥
निराकार ब्रह्म नाहीं आकारलें । रूप विस्तारिलें मायादेवी ॥३॥
मायादेवी जाली नांव आणि रूप । शुद्ध चित्स्वरूप वेगळेंचि ॥४॥
वेगळेंचि परि आहे सर्वांठायीं । रिता ठाव नाहीं तयाविण ॥५॥
तयाविण ज्ञान तेंचि तें अज्ञान । नाहीं समाधान ब्रह्माविण ॥६॥
ब्रह्माविण भक्ती तेंचि पें अभक्ती । रामदासी मुक्ती ब्रह्मज्ञान ॥७॥

२३
ब्रह्म हें निर्गुण मुळीं निराकार । तेथें चराचर कैसें जालें ॥१॥
जालें निराकारीं अहंतास्फुरण । एकीं एकपण प्रकटलें ॥२॥
प्रगटलें वै सें आकार नसतां । निर्गुण अहंता कोणें केली ॥३॥
कोणीं नाहीं केली सर्वहि मायिक । निर्गुण तें एक जैसें तैसें ॥४॥
जैसें तैसें सर्व मायिक रचिलें । निराकारीं जालें कोणेपरी ॥५॥
परी हीं नाथिलीं साच मानूं नये । नाहीं त्यासि काय पुससील ॥६॥
पुससील काय वांझेचीं लेंकरें । मृगजळपूरें भांबावसी ॥७॥
भांबावसी काय मूळाकडे पाहीं । मूळीं तेथें कांहीं जालें नाहीं ॥८॥
नाहीं कां म्हणतां प्रत्यक्ष दिसेतं । सत्यत्वें भासतें चराचर ॥९॥
चराचर सत्य हें केविं घडेल । अंधारीं बुडेल रविबिंब ॥१०॥
बिंब साहें मनीं दिसतें लोचनीं । तें कैंसें वचनीं मिथ्या होय ॥११॥
मिथ्या होय स्वप्न जागृती आलिया । तेंचि निजलिया सत्य वाटे ॥१२॥
सत्य वाटे मिथ्या मिथ्या वाटे सत्य । ऐसें आहे कृत्य अविद्येचे ॥१३॥
अविद्येचें कृत्य तुम्हीच सांगतां । मागुते म्हणतां जालें नाहीं ॥१४॥
नाहीं जालें कांहीं दृष्टीचें बंधन । तैसें हें अज्ञान बाधतसे ॥१५॥
बाधतसे परि सर्वथा नाथिलें । कांहीं जालें नाहीं ज्ञानियासि ॥१६॥
ज्ञानियासी दृश्य दिसतें कीं नाहीं । देहींच विदेही कैसे जाले ॥१७॥
जाली विदेहित अदेहींच असतां । दिसते पाहातां परि मिथ्या ॥१८॥
मिथ्य हे सकळ मज कां वाटेना । संशय तुटेना अंतरींचा ॥१९॥
अंतरीचा स्म्शय तुटे संतसंगें । कृपेचेनि योगें दास म्हणे ॥२०॥

२४
दश हे काशाचे कोणें उभारिले । मज निरोपिलें पाहिजे हें ॥१॥
पाहिजे हे दश भुज पंचकाचे । उभारिले साचे मायादेवी ॥२॥
मायादेवी कोण कैसी ओळखावी । जाणोनि त्यागावी ज्ञानबोधें ॥३॥
परी हे मायेची मिथ्या ओळखावी । आणि ती त्यागावी कोणेपरी ॥४॥
ज्ञानबोधें माया जाणोनि त्यागिली । परी नाहीं गेली काय कीजे ॥५॥
कीजे निरूपण संताचे संगती । तेणें शुद्ध मति होत असे ॥६॥
होत असे परि तैसीच असेना । निश्चळ वसेना मनामध्यें ॥७॥
मनामध्यें सदा विवेक धरावा । निश्चय करावा येणें रिती ॥८॥
रिती विवेकाची पाहतां घडीची । जातसे सवेंचि निधोनियां ॥९॥
निघोनियां जाय विवेक आघवा । तो संग त्यगावा साधकानें ॥१०॥
साधकानें संग कोणाचा त्यागावा । दृढ तो धरावा कोण संग ॥११॥
संग हा आदरें धरीं सज्जनाचा । त्यागीं दुर्जनाचा दास म्हणे ॥१२॥

२५२
कुमारीच्या पोटा ब्रह्मचारी आला । विचारिता जाला बाप तिचा ॥१॥
बापचि पुरूष ते तो मायाराणी । शब्द विचक्षणीं विचारावा ॥२॥
विचारितां होय नातुहि जामातु । प्रपिताहि मातु मिथ्या नाहे ॥३॥
मिथ्या नव्हे कदा हा देहसंबंधु । विस्तारे विविधु सोयरीक ॥४॥
सोइरे संबंधु नाहीं त्यानिर्गुणा । शाश्वताच्या खुणा दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP