मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
श्रीमंत दुःख झाले अन् मौल...

अमित वाघ - श्रीमंत दुःख झाले अन् मौल...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


श्रीमंत दुःख झाले अन् मौल्यवान चिंता
गेली भणंग करुनी आयुष्यमान चिंता !

जर आतलेच अश्रू तर रक्त पाज ताजे
म्हणते ‘ अजून नाही शमली तहान ’ चिंता !

हे आजकाल जीवन ज्या धावते गतीने
उघडून त्यामुळे ही बसली दुकान चिंता !

प्रत्येक माणसाच्या नशिबात खोट आहे...
अन् केवढी निघाली ही भाग्यवान चिंता !

माणून संकटांना घेतो कशा प्रकारे...
त्याच्यावरून ठरते मोठी - लहान चिंता !

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP