प्रासंगिक कविता - प्रसंग १०

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.


( शके १६०३ माघ वद्य ९ शनिवारीं दोनप्रहरीं श्रीसमर्थ परंधामास गेले. तत्पूर्वीं थोडा वेळ त्यांनीं श्रीरामरायापुढें बसून श्रींची प्रार्थना केली व जें शेवटचें मागणें मागितलें तें पुढील अभंगांत आहे. )
आज्ञेप्रमाणें परमार्थ । केला जाण म्यां यथार्थ ॥१॥
आतां देहाचा कंटाळा । आला असे जी दयाळा ॥२॥
आहे एकचि मागणें । कृपा करोनियां देणें ॥३॥
ज्याची दर्शनाची इच्छा । त्याची पुरवावी आस्था ॥४॥
ऐसें सखया वचन । त्यासी देईन दर्शन ॥५॥
तेरा अक्षरी मंत्राचा । जप करील तो साचा ॥६॥
त्याची संख्या तेरा कोटी । होतां भेटेन मी जगजेठी ॥७॥
भय न धरावें मनीं । बहु बोलिलों म्हणोनी ॥८॥
नलगे आसनीं बैसावें । नलगे अन्नही वर्जावें ॥९॥
येतां जातां धंदा करितां । जपसंख्या मात्र धरितां ॥१०॥
एका तेरा कोटींतचि । पापनाशन जन्मांतरिंची ॥११॥
मग तयासी दर्शन । देउनि मुक्त त्या करीन ॥१२॥
ऐसा वर होतां पूर्ण । दास जाला सुखसंपन्न ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP