प्रासंगिक कविता - प्रसंग ६

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.


( शके १५७७ सालांत निष्ठावंत शिष्य कोण कोण आहेत याची परीक्षा करण्याच्या हेतूनें श्रीसमर्थांनीं हातांत तलवार घेऊन वेड्याचें सोंग घेतलें; त्या समयीं कल्याण समर्थांच्या कसोटीस परिपूर्ण उतरले; पुढें कल्याणांच्या विनंतीवरून सज्जनगडावर परत येतांना समर्थांनी खालील पद म्हटलें. )
( चाल - धन्य हे प्रदक्षिणा. )
पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळीं ।
रामनामें हांक देउनी डोई कांडोळी ॥ध्रु.॥
वृत्तिसेंडी बंधनेंविण सदा मोकळी । संसाराची धुळी करुनि आंगीं उधळी ॥१॥
प्रपंचउकरड्यावरी बैसणें ज्याचें । भोंता पाळा फिरोनी पाहे जन हे अविद्येचे ॥२॥
धाउनि बैसे उठोनि पळे दृश्य वाटतें । अदृश्याचें राहाणें घेतां नचलें कवणाचें ॥३॥
आउट हात गज नवां ठाईं वितुळलें । दाहावा ठाव म्हणऊन तेथें ठिगळ दिधलें ॥४॥
ऐसें मन हें चंचळ निवृत्तीसी गुंतलें । परतुनियां आलें म्हणऊनि जीवेंसि मारिलें ॥५॥
मीपणाचे शाहाणपण जळालें माझें । कोण वाहे देहबुद्धीवस्त्राचें ओझें ॥६॥
नलगे आम्हां मानअपमानाचें ओझें । तुझी शुद्धी घेतां गेलें मीपण माझें ॥७॥
आम्ही जन धन देखुनि वारचि करितों । आपणाऐसे पिसे देखुनि उमज धरितों ॥८॥
आर्तें भेटों येतीं त्यांस वेड लावितों । रामीरामदास ऐसें अबद्ध बोलतो ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP