मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्‍णाजी नारायण आठल्‍ये|

तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


श्लोक [मंदक्रांता]

रों रों रों रों करुनि गगनीं वाहतो काय वारा ।
हा हा हा क्षणभरि नसे तेथ कोणा निवारा ॥
बोटीमाजी शिरूनि जल ही कैक लोंढें वहाती ।
डांबा खांबा धरूनि जन तैं संकटानें रहाती ॥८॥

धुंदी येते पसरूनि धुकें कोठचें सूर्यबिंब ।
वस्त्रें पात्रें भिजुनि भिजुनी होतसें सर्व चिंब ॥
चित्तीं चिंता प्रबळ न कळे सांज किंवा सकाळ ।
ग्रासायाला खवळुनि जणों पातला काय काळ ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP