दीपक अलंकार - लक्षण ५

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


(ह्या श्लोकांत ‘भाति’  हा एक  साधारण  धर्म  श्लोकाच्या  प्रारंभीं आला आहे.)
“लावण्यामुळें  तरुण  स्त्री,  मदाच्या  अतिरेकामुळे  श्रेष्ठ  हत्ती, व  वैभवामुळें  तूं,  (भवकान् =  भवान्)  व  तुझ्यामुळें  पृथ्वीमंडळ  शोभतें.”   
(येथें  भाति हा  एक धर्म  श्लोकाच्या  मधोमध  आला आहे.)
“स्वर्ग  इंद्रामुळें, पाताळ  सर्पश्रेष्ठ वासुकीमुळें,  (शब्दश :---  सर्पाच्या कुळाच्या कुण्डलरूप  अशा),  व हे  लोकांचें भूषण असणार्‍या व शत्रूंचें खंडन  करण्यार्‍या राजा ! हें  भूमण्डल  तुझ्यामुळें  अत्यंत  शोभतें.”
(येथें  विभातितमाम् हा  एक धर्म  श्लोकाच्या शेवटीं  आला आहे).
अशा रीतीनें तीन  प्रकार  होणें  ही गोष्ट  तुल्ययोगितेंतही शोधून  काढावी.
खरें  सांगायचें  म्हणजे धर्म प्रथम आला, मध्यें आला व शेवटीं  आला तरी,  त्यामुळें चमत्कारांत कांहीं  फरक पडत  नसल्यामुळें (त्यामुळें),  तीन  प्रकार होतात असें म्हणणें  वरवर  ठीक दिसतें  (पण वस्तुत: त्यांत तथ्य  नाहीं).  हे तीन प्रकार  मानले तर  धर्म पहिल्या  भागवाचे पूर्वीं,  मध्यभागाचे पूर्वीं व शेवटच्या पूर्वीं  आल्यास,  अथवा  त्यापेक्षां कमीजास्त  ठिकाणीं  आल्यास त्यामुळेंहीं,  अनंत प्रकार  होण्याचा  प्रसंग  येईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP