ह्याळसेन कथा - अभंग १५१ ते १७५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


द्रोणु बानीं नरुषत । ते सर्वांगीं खडतरत । अशुद्धाचे पुर वाहत । तयेवेळीं ॥१५१॥
परी न मानी तयाचिया मना । जंव गदाघातु द्याबा द्रोणा । तंव कर्णे केलें संधाना । तयेवेळीं ॥१५२॥
तैसाच दिधला अवघातू । मोडिला कर्णाचा रथू । तयेवेलीं तो सूर्यसुतू । चरणीं चाले ॥१५३॥
कर्ण द्रोण वरुण चाली । वरुषताती शरधारीं । तेथें खोचे जिव्हारी । महावीरु तो ॥१५४॥
कृपाचार्य अश्वत्थामा । थोर पेटले संग्रामा । दु:शासना साउमा । पावला तेथें ॥१५५॥
ऐसें कौरवसैन्य मिळालें । शरधारीं वरुषले । जैसे अ-भ्रामाजीं झांकुळलें । रविबिंब ॥१५६॥
तेवेळीं तो ह्माळसेनू । करीं घेउनी धनुष्यबाणू । करिता जाला संधानू । वीरराजु ॥१५७॥
तेणें शरजाळ तोडुनी । धनुष्य पाडिलें धरणीं । खंड विखंड अरणी । कौरवसैन्य ॥१५८॥
मग भुद्नल हातीं घेतला । चरण चाली उतरला । गुरु हाणितला । मस्तकावरी ॥१५९॥
घाईघाई आली कळवळी । मूर्च्छा येऊनि पडला भूमंडलीं । तंव पिटिली एक टाळी । कौरवसैन्यीं ॥१६०॥
मागुता आला रथावरी । कर्णूं विंधिला दारी शरीं । सा-रथि आणि वारू चारी । पडिले रणीं ॥१६१॥
सवेंचि गदा घेऊनि । धावि-त्रला चरणीं । अश्वत्थामा हाणोनि । पाडिला धरणीं ॥१६२॥
तयाची परी कृपाचारी । गदाघातें हाणितला शिरीं । पाडिला धरणीयेवरी । मूर्च्छागतु ॥१६३॥
तें देखोन दुर्योधनू । पळाला रथ घेऊनि । सबळु आणि दु:शासनू । पळती पुढा ॥१६४॥
तंव समसप्तकु पाचारिला । वीरा राहे राहे सैरा । तेथें दोघां संग्रामु झाला । घोर देखा ॥१६५॥
उरीं शिरीं कपाळीं । जानु जांग वक्षस्थळीं । दोघे वीर महाबळी । न लोटती एकमेकां ॥१६६॥
तंव तेणें ह्माळसेनें । समसप्तकु हाणि-तला त्राणें । थोर मूर्च्छा आली तेणेम । पडला धरणीं ॥१६७॥
दे-खोनि सैन्या सुटला पळू । कौरव सैन्यामाजी हलकल्लोळू । तो खव-ळला महाकाळू । अंगवेना ॥१६८॥
कौरवसैन्य पुढें पळत । थोर हाहाकार होत । तेथें वर्तले जुगांत । महावीर ॥१६९॥
तंव वो-लिला दुर्योधनु । श्रीगुरु कोठवरी पळोन । या पुढें नाहीं जाणें । सर्वथा आह्मी ॥१७०॥
हा कपटिया नारायणू । येणें रचिलेंसे नि-र्वाणू । नातरी कैमचा ह्माळसेनू । कोठुनी आला ॥१७१॥
न कळती या कृष्णाचें मत । एकएकासी निर्माण करीत । जय देणें पांडवांसा । भलतीयेपरी ॥१७२॥
पहाजी सोळा वरुषाचा वीरु । अभिमन्यु धा-कुटें लेंकरूं । तेणें केला संहारूं । महावीरांचा ॥१७३॥
तंव बोलले द्रोण गुरु । इतुका जाणसी विचारु । तरी कां करिसी वैराकारु । राज्य नेदिसी त्यांचें ॥१७४॥
देवो तयाचा सारथी । ऐसें जाणसी निगुती । तरी कां धरितोसी अनिती । विचारू दुजा ॥१७५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP