लळित - पदे ४१ ते ४९

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥४१॥ कोण मी मज कळतचि नाहीं । सारासारविचार शोधूनि पाही ॥१॥
नारी म्हणों तरी नरचि भासे । नर म्हणों तरी समूळ विनासे ॥२॥
दास म्हणों तरी रामचि आहे । राम म्हणों तरी नाम न साहे ॥३॥

॥४२॥ आतां तरि जाय जाय जाय । धरी सद्रुरूचे पाय ॥ध्रु०॥ संकल्प विकल्प सोडूनि राहें । दृढ धरुनी पाय पाय पाय ॥१॥
नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । त्याणें वाचुनी काय काय काय ॥२॥
मानवतनु ही नये मागुती । बरें विचारुनि पाहें पाहें पाहें ॥३॥
आत्मानात्मविचार न करितां । व्यर्थ प्रसवली माय माय माय ॥४॥
सहस्त्र अन्याय जरी त्वां केले । कृपा करील गुरु माय माय माय ॥५॥
रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय्र खाय खाय ॥६॥

॥४३॥ अरे नर सारविचार कसा ॥ध्रु०॥ क्षीर नीर एक हंस निवडिती । काय कळे वायसा ॥१॥
माया ब्रह्म एक संत जानती । सारांश घेती तसा ॥२॥
दास म्हणे वंद्य निंद्य वेगळें । कर्मानुसार ठसा ॥३॥

॥४४॥ अरे मन पावन देव धरी । अनहित न करी ॥ध्रु०॥ नित्यानित्यविवेक करावा । बहुजना उद्धरीं ॥१॥
सकळ चराचर कोठुनि जालें । कोठें निमालें तरी ॥२॥ दास म्हणे जरी समजसी तरी । मुळींची सोय धरीं ॥३॥

॥४६॥ भूतकाळीं कर्म केलें वर्तमानीं आलें । त्याचें सुख मानूनियां भोगितो आपुलें ॥ध्रु०॥
सुखदु:खभोग जाला तोचि मागिल ठेवा । आतां दु:ख मानू नको करी राम सेवा ॥१॥
बाईल मेली पोर मेलें द्रव्य नाहीं गांठीं । तळमळ लागली जीवीं कांरे होशी कष्टी ॥२॥
जें जें दु:ख होतें जीवा तेंचि मागिल कर्म । आतां त्याचें सुख मानी स्मर राम नाम ॥३॥
नामाविण राहूं नको असा फजित होशीं । पुन्हां घडे नये बापा नरकामध्यें जाशी ॥४॥
भविष्याचा धोका तुझे हातामध्यें आहे । पळभर विसरूम नको नाहिं कोणी साह्ये ॥५॥
सावध होंई सावध होंई किती सांगूं तुजला । तुजला । परिणाम कठीण मोठा शरण जांई गुरुला ॥६॥
दास म्हणे जालें तें तरी होउनियां गेलें । नको नको म्हणतांहि भोगवितें केलें ॥७॥ भूतकाळीं० ॥

॥४७॥ एकला जगदंतर जाहला । आणीक कोणीव नाहीं तयाला ॥१॥
चारी खाणी चारी वाणी । हालवी बोलवी चालवी त्याला ॥२॥
एक धरी एक त्यागीत आहे । आपण आपण भोगवीत आहे ॥३॥
दस म्हणे हा बहुविध तमासा । पाहिल तो मग होईल तैसा ॥४॥

॥४८॥ ज्या ज्या वेळे जें जें होईल तें तें भोगावें । विवेकाला विसरुनि आपण कष्टी कां व्हावें ॥धृ०॥
एकदां एक वेळ बहु सुखाची गेली । एकदां एक वेळ जीवा बहू षीडा झाली ॥१॥
एकदां मागूं जातां मिळती षड्‍रस पक्कान्नें । एकदां मागूं जातां न मिळे भाजीचें पान ॥२॥
सुकृत दुष्कृत दोन्ही पूर्वदत्ताचें फळ । ऐसें प्राणी जाणेना तो मूर्खचि केवळ ॥३॥
देह दु:खास मूल ऐसें बरवें जाणोन । सुखदु:खाविरहित रामदास आपण ॥४॥
ज्या ज्या० ॥

॥४९॥ घटका गेलीं पळें गेलीं तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कांरे म्हणाना ॥१॥ एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले । विषयाच्या संगामुळें चारी प्रहर गेले ॥२॥
रात्र कांहीं झोंप कांही स्त्रीसगें गेली । ऐशी आठा प्रहरांची वासलाद झाली ॥३॥
दास म्हणे तास वाजे सकळां स्मरण देतो । वेळोवेळां राम म्हणा म्हणोनि झणकारितो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP