लळित - पदे ११ ते २०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥११॥ नवमी करा नवमी करा । नवमी करा भक्ति नवमी करा ॥धृ०॥ अष्टमी परी नवमी बरी । तये दुसरी न पवे सरी ॥१॥
राम प्रगटे भेट हा तुटे ॥ अभेट उमटे तेचि नवमी ॥२॥
शीघ्र नवमी येतसे ऊमीं । रामदास मी अपिली रामीं ॥३॥

॥१२॥ दीनबंधू रे दीनबंधू रे दीनबंधू रे । राम दयासिंधु रे ॥ध्रु०॥ भिलटीफळें भक्तवत्सलें । सर्व सेविलीं दास प्रेमळें ॥१॥
चरणीं उद्धरी दिव्य सुंदरी । शापबंधनें मुक्त जो करी ॥२॥
वेदगर्भ जो शिव चिंतितो । वानरा रिसा गूज सांगतो ॥३॥
राघवांबिजें रावणानुजें । करुनि पावला निजराज्य जें ॥४॥
पंकजाननें दैत्यभंजनें । दास पाळिळे विश्रमोहनें ॥५॥

॥१३॥ मांबुजाननं मांबुजाननं मांबुजाननं मांबु देहि मे ॥ध्रु०॥ योगिरंजनं चाप-भंजनं । जनकजापतिं विश्वमोहनं ॥१॥
निबुधकारणं शोकहारणं । अरिकुलांतकं भयनिवा-रणं ॥२॥
जयकृपालयं दासपालयं । चरणपंकजं देहि मे लयं ॥३॥

॥१४॥ ऐसें ध्यान समान न दिसे राम निरुपमलींळा । सांवळें सुंदर रूप मनोहर शोभति सुमनमाळा ॥ध्रु०॥ मुगुटकिरीटीं कुंडले मंडित गंडस्थळावरी शोभा । केयूरदंड उदंड विभूषण लावण्याचा गाभा ॥१॥
सरळ कुरळ नयन कमळदळश्याम सकोमळ साजे । झळके इंद्रनीळ तळपे रत्नकिळ मुनिजनध्यानीं विराजे ॥२॥
भाळ विशाळ रसाळ विलेपन परिमळ अनिळविलासी । मृगमद केशर धूसर आंगीं हसितवदन सुखरासी ॥३॥
कटितट वेंकट कासे पीतपट मिंरवट उटी सुगंधें । रुळत कल्लोळ सुढाळ माळिका डोलती तेणें छंदें ॥४॥
जडितपदक वीरकंकण किकिणी आंदु नेपुर वाजे । सरळ रिपुकुळ निर्मळ ऐसें वांकी तोडर ब्रीद गाजे ॥५॥
करिं शरचाप विलाप दानवां काळरूप मनिं भासे । दास म्हणे रणकर्कश रामें अंतक तोही त्रासे ॥६॥

॥१५॥ मिरासीचा ठाव मिरासीचा ठाव मिरासीचा ठाव धरा रे । जेथुनि आले तिथेंचि जाउनि मागुति बास करा रे ॥ध्रु०॥ अज्ञानदारिद्य निरसिलें ज्ञानलक्षूतीतें कोण पुसे । आपणचि सर्वही अहंकार गोत्रजघातघेषा तेथ नेतसे । एकपद तेथें विपट नाहीं सर्वही सिद्धी विलसे । ऐसी हे मिरासी टाकियेली थोर मस्तकीं अभिमानपिसें ॥१॥
संतसनका-दिक नारद तुंबर वृत्ती तेही लक्षिली । नागवे उघडे आपदा भोगुनि जीवेसीं सदृढ धरिली । वडिलांची जन्ममृत्युभूमी तेही सर्वकाळ यत्न केली । धिगीधिगी तें जिणें पूर्वजांची वृत्ति असोनि हातीची गेली ॥२॥
एकला मी रामदास वृत्तीलागी होय पिसा । तनु मनु धनु सर्वही अर्पुनी सोडिली जीवित्वआशा । नि:कामता कोणी पाठीसी नादले एकचि थोर कोंवसा । हे वृत्ति रक्षिल माझा राम त्याचा मज भरंवसा ॥३॥

॥१६॥ आलिया अंगेंचि होइजे देव । कोंदाटला ब्रह्मकटाव ॥ध्रु०॥ भवसिंधूचें जळ आटळें । संसाराचें मूळ तुटलें ॥१॥ निजधनाची लाधली ठेवी । रंक पावले राजपदवी ॥२॥
अरे काळाची वेळ चुकली । आनंदाची लुटी फावली ॥३॥
जे मायेनें जन्म दाविला । ते मायेचा ठाव पुसिला ॥४॥
रामदासाचि राम भेटला । थोर संदेह हा तूटला ॥५॥

॥१७॥ वेडिया स्वामीच होउनि राहें हे उपाधी तुज न साहे ॥ध्रु०॥ अरे तुझाचि तूं सकळ । तरी वायांचि कां तळमळ ॥१॥
स्वामी सेवकपण हें वाव । अभिमानाची कैंचा ठाव ॥२॥
अभंगळें जाणसी साचें । काय भूषण सांगाची त्याचें ॥३॥
मीपणाचें मूळ तुटावें । आनंदाचें सुख लुटावें ॥४॥
रामदासचि नांव हें फोला ।तेथें कायसे लागती बोला ॥५॥

॥१८॥ देवाची करणी ऐसी ही ॥ध्रु०॥ पहा दशगुणें आवरनोदकीं । तारियेली धरणी ॥१॥
सुरवर पन्नग निर्मूनियं जग । नांदवी लोक तिन्ही ॥२॥
अंडज जारज स्वेदज उद्भिज । निवडिली खाणी ॥३॥
रात्रीं सुधाकर तारा उगवती । दिवसा तो तरणी ॥४॥
सत्तासूत्रे वर्षत जळधर । पीक पिके धरणीं ॥५॥
आपण तरी स्त्रिये निन निर्गुण । दासा हदयभुवनीं ॥६॥

॥१९॥ गुरु दातारें दातारें । अभिनव कैसें केलें ॥ध्रु०॥
एकचि वचनें न बोलत बोलूनि । मनास विलया नेलें ॥१॥
भूतसंगें कृतनैश्वर ओझें । निजबोधें उतरीलें ॥२॥
दास म्हणे मज मीपणाविरहित । निजपदीं नांदविलें ॥३॥

॥२०॥ भावबळें तरले मानव ॥ध्रु०॥ सारासारविचार विलोकुनि । भव हा निस्तरले ॥१॥
रामनाम निरंतर वाचे । निजपदी स्थिरले ॥२॥
दास म्हणे सुख सागर डोहीं । ऐक्यपणें विरालें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP