वारांची गीते - धांवा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ धांव रे रामराया किती अंत पाहाशी । धांव रे रामराया० ॥ धृ० ॥ प्राणांत मांडि-लासे नये करुणा कैसी । पाहीन धणिवरी चरण झाडीन केशीं । नयन शीणले बा आतां केधवां येथी । धांव रे ० ॥१॥
मीपण अहंकारें अंगीं भरला ताठा । विषयकर्दमांत लाज नाहीं लोळतां । चिळस उपजली ऐसें झालें बा आतां ॥ धांव रे० ॥२॥
मारुतीस्कंधमागीं शीघ्र बैसोनि यावें । राघवें वैद्यराजें कृपाऔषध द्यावें । दयेचे पद्महस्त माझे शिरीं ठेवावे ॥ धांव० रे० ॥३॥
या भवीं रामदास थोर पावतो व्यथा । कौंतुक पाहातोसी काय जानकी-कांता । दयाळा दीनबंधु भक्तवत्सला आतां ॥ धांव रे० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP