करुणाष्टकें - अष्टक ५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


युक्ति नाहीं बुद्धि नाहीं विद्या नाही विवंचितां । नेणता भक्त मी तूझा बुद्धि दे ॥ रघूनायका ॥१॥
बोलतां चालतां येना कार्यभाग कळेचिना । बहू मी पीडिलों लोकीं बुद्धि दे रघुनायका ॥२॥
तुझा मी टोणपा झालों कष्टलों बहुतां परी । सौख्य तें पाहतां नाहीं बुद्धि दे रघुनायका ॥३॥
नेटकें लिहितां येना वाचितां चूकतों सदा । अर्थ तो सांगतां येना बुद्धि दे रघुनायका ॥४॥
प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घसूचना । मैत्रिकी राखितां येना बुद्धि दे रघुनायका ॥५॥
संसार नेटका नाहीं उद्वेग वाटतो जिवीं । परमार्थ हा कळेना बुद्धि दे रघुनायका ॥६॥
उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे । तूं भक्तवत्सला देवा बुद्धि दे रघुनायका ॥७॥
कायावा चामनोभावें तूझा मी म्हणवीतसें । हे लाज तूजला माझी बुद्धि दे रघुनायका ॥८॥
मुक्त केल्या देवकोटि भूभार फेडिला बळें । भक्तासि आश्रयो मोठा बुद्धि दे रघुनायका ॥९॥
उदंड भक्त तुम्हाला आम्हांला कोण पूसतें । ब्रीद हें राखणें आधीं बुद्धि दे रघुनायका ॥१०॥
उदंड ऐकिली कीर्ती पतीतपावना प्रभो । मी एक रंक निर्बुद्धी बुद्धि दे रघुनायका ॥११॥
आशा हे लागली मोठी दयाळूवा दया करी । आणखी न लगे कांही बुद्धि दे रघुनायका ॥१२॥
रामदास म्हणे माझा संसार तुज लागला । संशयो वाटतो पोटीं बुद्धि दे रघुनायका ॥१३॥
जयजय रघुवीर समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP