करुणाष्टकें - अष्टक ३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


नसे भक्ति ना ध्यान ना ज्ञान कांहीं । नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं । असा दीन अज्ञान मी दास तूझा । समर्था जनीं घेतला भार माझा ॥१॥
रघूनायका जन्मजन्मांतरींचा । अहंभाव छेदोनि टाकी दिनाचा । जनीं बोलती दस या राघवाचा । परी अंतरीं लेश नाहीं तयाचा ॥२॥
रघूनायका दीन हातीं धरावें । अहंभाव छेदोनियां उद्धरावें । अगूणी तयालगिं गूणी करावें । समर्थें भवोसागरीं ऊतरावें ॥३॥
किती भार घालूं रघूनायकाला । मजकारणें शीण होईल त्याला । दिनानाथ हा संकटीं धाव घाली । तयाचेनि हे सर्व काया निवाली ॥४॥
मला कायसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे फीटली सर्व चिंता । समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें । सदा सर्वदा नाम वाचें वदावें ॥५॥
दिनाचें उणें दीसतां लाज कोणा । जनीं दास दीजे तुझा दैन्यवाणा । शिरीं स्वामि तं राम पूर्णप्रतापी । तुझा दास पाहे सदा शीघ्रकोपी ॥६॥
जयजय रघुवीर समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP