स्फुट श्लोक - भागवत २

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


विषें भरूनियां स्तना । कुटिल धात पूतना । हरीस होय माउसी । बळें चि सोखिली कसी ॥१॥
रीठा सकट पाडिलें । तरु धरून मोडिले । भुजंग रूप ताणिला । दुजा फणी पलणिला ॥२॥
त्रुणासुरांसि मारिलें । कगा बगासि चीरिले । पदीं धरूनि धनुका । गडयांस वांटितो सखा ॥३॥
धरूनि देव गीळिला । मुखीं भुगोळ दाविला । रसाळ बाळ लाघवी । लिळा कळेचिना कवी ॥४॥
मनुष्य बापुडें किती । विधी सुरेंद्र नेणती । तिहीं प्रचीत पाहिली । उपाय शक्ति राहिली ॥५॥
गुरें समस्त वांसुरें । बहु प्रकार लेंकुरें । परोपरीं तनें मनें । खिलार सार गोधनें ॥६॥
चतुर चोरटा विधी । प्रसंग तो निरावधी । समस्तही ही परोपरीं । स्वयेंचि जाहाला हरी ॥७॥
परेश हा परात्परु । विधी तयास तश्करु । अनेक लोक रंजिला । वरीष्ट गर्व भंजिला ॥८॥
सुरेंद्र मेघ वोळले । कडकसें कलोळलें । बळें विजा झकाकिती । नभीं दिशा लखाखिती ॥९॥
गडदसें परोपरीं । अचाट गर्जना करी । कितेक त्या घबाबिल्या । सिळा भुमी धबाबिल्या ॥१०॥
धुधाट वात सुटला । गमे भुगोळ फुटला । श्रीकृष्ण नाथ गोकुळीं । गिरी धरी करांगुळीं ॥११॥
समागमेंचि गोकुळीं । बळेंचि वोणचा गिळी । कितेक मल्ल मारिलें । बहु रिपु विदारिले ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP