मानपंचक - मान पंचम

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


जयासी दु:ख सांगावें । तयापाशीं दुणें वसे ।
दुणें हि तें चतुर्गुणें । बहुगुणें सरोचिना ॥१॥
त्रैलोक्य व्यापिलें दुखें । ज्याचें त्याचें परोपरीं ।
उगेंची अनुमानेना । सांगतां सांगतां कळे ॥२॥
दु:ख जाणे पराव्याचें । ऐसा तो विरुळा गुणी ।
ऐकतां ऐकतां ऐके । तेणेंची आवडी दुणी ॥३॥
ऐकतां अंतरीं घेतां । क्षणक्षणा विचारितां ।
हळु हळु हळु होतें । पावतें सुख संगती ॥४॥
दु:ख वांटून तें घ्यावे । काढावें ऐसीयापरी ।
देहे दु खें रोगव्याधी । औषधें परतें करी ॥५॥
सदबुधी सांगणें लोकां । जेणें ते सुख पावती ।
प्रसंग राखणें आधीं । सोसावें बहुतांपरी ॥६॥
न्याय अन्याय सोसावा । सोसीतां हि विटों नये ।
न्युन्य पशुन्य झांकावें । तेणें तें प्रस्तावां पडे ॥७॥
चुकतें मागुतें येतें । येतें जातें पुन्हपुन्हा ।
क्षमून हितकर्ता जो । तोची गंभीरे जाणता ॥८॥
नेणता उमजे जेथें । जाणतां तोची बोलिजे ।
नैराश ने घतां सांगे । निववी दंदनापरी ॥९॥
सांगणें नीती न्यायाचें । मानावें बहुतांपरीं ।
सर्वत्र मान्य तो ज्ञाता । प्रत्यय बोलतो खरें ॥१०॥
न्याय अन्याय तो जाणे । अन्याय न करी कदा ।
नीती न्यायें मिळो जाणे । तोची तो लोकसंग्रही ॥११॥
मछरु ने दखे दृष्टी । न पदे कातर्‍यामव्यें ।
जाणते लोक नीसीचे । तेथें ची वास तो करी ॥१२॥
मनेंची पारखी लोकां । परंतु नोबले कदा ।
जाणते मिळती तेथें । नेणते वास पाहाती ॥१३॥
जाणत्या नेणत्या लोकां । प्रसंगें वर्तवी जगीं ।
सामान्य तो नव्हे कांहीं । सर्वांसी पाहिजे सदा ॥१४॥
प्रबोध जाणीजे ऐसा । आधीं प्रपंच शोधणें ।
आरत्र मानतां लोकां । परत्र सहजी घडे ॥१५॥
अंतरें निवउं जाणे । जाणे जयातयापरी ।
धरावें अंतरें लोकां । बाह्याकारें धरेतिना ॥१६॥
मनुष्यें राखतां राजी । दैवतें बहु माणसें ।
सुखची पावती जेथें । तेथें ते धांवती सदा ॥१७॥
श्रेष्ठें जो तोची जाणावा । बहुतां मानतां मनीं ।
सकळांसी मिळों जाणे । बहुतांसी बहुतांपरीं ॥१८॥
तोची तो अंश देवाचा । मिळाला जगदांतरें ।
नैराश तापसी ज्ञानी । सर्वांसी पाहिजे सदा ॥१९॥
हिंडतां हिंडतां लोकी । आवडे नित्य नूतनु ।
पुण्यात्मा सुकृती धमीं । भक्तराज भुमंडळीं ॥२०॥
कर्म उपासना राखे । राखे वैराग्य आदरें ।
ज्ञान तें प्रत्ययें राखे । नित्यानित्यविचारणा ॥२१॥
काळ तो नेटका घाली । हरीकथानिरूपणें ।
विचारें प्रत्यया आणीं । धूर्त ताकींक तीक्षणु ॥२२॥
प्रबोध लागतां लोकीं । नेमस्त सुटीका घडे ।
पावनु तोची तो येकु । बद्ध लोकांसी सोडवी ॥२३॥
बंधनें तोडिलीं रामें । योगधामें दयाळुवें ।
बुद्धीयोग प्रयोगानें । मुक्त भक्त ततक्षणीं ॥२४॥
धन्य हा देव देवांचा । राम त्रैलोक्यनायकु ।
रामदास म्हणे त्याचा । अनन्य शरणांगतु ॥२५॥

इति श्रीमानपंचक सारासारविवेकनिरूपणनाम मान पांचवें ॥ छंदसंख्या ॥१२५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP