प्रासंगिक कविता - क्षात्रधर्म

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


अल्पस्वल्प संसारधर्म । मागां बोलिलों राजधर्म । आतां ऐका क्षात्रधर्म । परम दुर्लभ जो ॥१॥
जयास जिवाचें वाटे भय । त्यानें क्षात्रधर्म करूं नये । कांहीं तरी करूनि उपाय । पोट भरावें ॥२॥
विन्मुखमरणीं नर्क होती । वांचून येतां मोठी फजिती । इहलोक परलोक जाती । पाहाना कां ॥३॥
मारितां मारितां मरावें । तेणें गतीस पावावें । फिरोन येतां भोगावें महद्भाग्य ॥४॥
नजरकरार राखणें । कार्य पाहुनी खतल करणें । तेणें रणशूरांचीं अंत:करणें । चकित होती ॥५॥
जैसा भांडयांचा गलोला। निर्भय भारामध्यें पहिला । तैसा क्षत्री रिचवला । परसैन्यामध्यें ॥६॥
नि:शंकपणें भार फुटती । परवीरांचे तबके तुटती । जैसा बळिया घालूनि घेती । भैरी उठतां ॥७
ऐसे अवघेच उठतां । परदळाची कोण चिंता । हरणें लोळवी चित्ता। देखत जसा ॥८॥
मर्दै तकवा सोडूं नये । म्हणजे प्राप्त होतो जय । कार्यप्रसंग समय ओळखावा ॥९॥
कार्य समजेना अंतरें । ते काय झुंजेल बिचारें । युद्ध करावे खबरदारें । लोक राजी राखतां ॥१०॥
दोन्हीं दळें एकवटें । मिसळताती लखलखाटें । युद्ध करावें खबरदारें । सीमा सांडूनी ॥११॥
देवमात्र उच्छेदिला । जित्यापरीस मृत्यु भला । आपुला स्वधर्म बुडविला । ऐसें समजावें ॥१२॥
मराठा तितका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा । येविषयीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥१३॥
मरणहांक तों चुकेना । देह वांचविताम वांचेना । विवेका होऊनि समजाना । काय करावें ॥१४॥
भले कुळवंत म्हणावें । तेंहीं वेगीं हजीर व्हावें । हजीर न होतां कष्टावें लागेल पुढें ॥१५॥
एक जाती दोन जाती पावला । तो कैसा म्हणावा भला । तुम्हां सकळांस कोप आला । तरी क्षमा केला पाहिजे ॥१६॥
देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते । देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशय नाहीं ॥१७॥
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलूखबडबा कां बडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ॥१८॥
विवेक विचार सावधपणें । दीर्घ प्रयत्न केलचि करणें । तुळजावराचेनि गुणें । रामें रावण मारिला ॥१९॥
अहो हे तुळजा भवानी । प्रसिद्ध रामवरदायिनी । रामदास ध्यातो मनीं । यन्निमित्त ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP