षड्रिपुविवेचन - कामनिरूपण

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


भल्यासी वैर करिती ते साही ओळखा बरें । षड्रिपु कामक्रोधादि मदमत्सर दंभ तो ॥१॥
प्रपंच साहवा वैरी तयांना जिंकितां बरें । भल्यासी लविती वेडा परत्र मार्ग रोविला ॥२॥
काम आरंभिंचा वैरी निष्काम बुडवी सदा । कामना लागली पाठी काम काम करी जनीं ॥३॥
काम उत्पन्न होताहे ते वेळे नावरे जना । कामवेड जडे ज्याला तो प्राणी आत्मघातकी ॥४॥
कित्येक योषितेसाठीं कां तरी मृत्यु पावले । झडाच घालिती नेटें पतंगापरि भस्मती ॥५॥
आपणा राखणें नाहीं शुद्धि नाहीं म्हणोनियां । सभाग्य करंटे होती वेश्येसीं द्रव्य नासिती ॥६॥
कित्येक भोरपी झाले किती गेले उठोनियां । बाटले भ्रष्टके मेले बुडाले कामसेवनीं ॥७॥
व्याधीनें नासती अंगें नासिके झडती जनीं । औषधें दंतही जाती रूपहानीहि होतसे ॥८॥
रूपहानि शक्तिहानि द्रव्यहानि परोपरी । कुलहानि यातिहानि सर्व हानीच होतसे ॥९॥
कित्येक नाशिले भोगें लोकलाजचि सांडिली । शुभा-शुभ नसे तेथें नीचा उचं भ्रष्टती ॥१०॥
कामाचे व्यसनें गेले मातले रतले जनीं । तारुण्य दोंदिसांसाठीं जन्म दुर्लभ नाशिला ॥१॥
विधीनें विषया घ्यावें अविधि नसतां बरें । आश्रमीं न्यायनीतीनें प्रपंच करणें सुखें ॥१२॥
लटकें नासती काया चेटकें तीं परोपरी । जारणा मारणादिकें नाटकें चेटकें बहू ॥१३॥
चेटका देवतें भूतें जन्महानीच होतसे । म्हणोनि काम हा वैरी आकळावा परोपरी ॥१४॥
ऐसा निरूपिला काम क्रोध तो बोलिला पुढें । कोप तो तामसी प्राणी तमोगुणीं अधोगति ॥१५॥
इतिश्री काम हा वैरी जेणें पाडि यलें भवीं । तो राही सकळां ठायीं विवेकें जाणिजे बरें ॥१६॥
॥ कामनिरूपण समाप्त ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP